शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

coronavirus : कोरोनाविरोधात केंद्र सरकारने केलेल्या उपययोजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केले मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 17:32 IST

कोरोनासंबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत मोठे विधान केले आहे. 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या देशात होत असलेल्या फैलावामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि विविध राज्यातील सरकारांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान कोरोनासंबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेकेंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत मोठे विधान केले आहे. 

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सर्व अत्यावश्यक पावले उचलली आहेत, असे संपूर्ण देशाचे मत आहे. एकंदरीत सरकार चांगले काम करत आहे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.  कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारला आवश्यक ती पावले उचलण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. कोविड-19 विषाणूची तपासणी करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे वर्ग केली आहे. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्राने केलेल्या तयारीबाबत सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांवर आम्ही समाधानी आहोत. सरकारचे टीकाकारदेखील सरकारकडून योग्य काम करत असल्याचे मान्य केले जात आहे. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती एल. एन. राव आणि सूर्यकांत यांचाही समावेश होता.

दरम्यान, दुसरीकडे देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र असे असूनही लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या