शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

coronavirus : कोरोनाविरोधात केंद्र सरकारने केलेल्या उपययोजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केले मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 17:32 IST

कोरोनासंबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत मोठे विधान केले आहे. 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या देशात होत असलेल्या फैलावामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि विविध राज्यातील सरकारांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान कोरोनासंबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेकेंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत मोठे विधान केले आहे. 

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सर्व अत्यावश्यक पावले उचलली आहेत, असे संपूर्ण देशाचे मत आहे. एकंदरीत सरकार चांगले काम करत आहे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.  कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारला आवश्यक ती पावले उचलण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. कोविड-19 विषाणूची तपासणी करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे वर्ग केली आहे. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्राने केलेल्या तयारीबाबत सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांवर आम्ही समाधानी आहोत. सरकारचे टीकाकारदेखील सरकारकडून योग्य काम करत असल्याचे मान्य केले जात आहे. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती एल. एन. राव आणि सूर्यकांत यांचाही समावेश होता.

दरम्यान, दुसरीकडे देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र असे असूनही लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या