शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रुग्णवाहिका न मिळाल्यानं कारच्या टपावर वडिलांचा मृतदेह बांधून मुलगा स्मशानभूमीत पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 15:42 IST

जयपूर हाऊस येथे राहणाऱ्या मोहित यांना अनेक प्रयत्न करूनही वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही.

ठळक मुद्देअखेर मोहितने वडिलांचा मृतदेह कारच्या टपावर बांधून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत नेला.अंत्यसंस्कारासाठी वेळ आल्यानंतर कारच्या टपावरील मृतदेह काढताना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. एका दिवसात १-२ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते त्याठिकाणी आता दिवसाला ७-८ मृतदेह येत आहेत.

आग्रा – कोरोना महामारीचा कहर देशात पाहायला मिळत आहे. एकीकडे संक्रमण वाढत चाललं आहे तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. दिवसाला ४० पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मृतदेह स्मशानभूमीकडे घेऊन जाण्यासाठी अँम्ब्युलन्स मिळत नाहीत. एका एका अँम्ब्युलन्समध्ये ३-४ मृतदेह घेऊन जावं लागत आहे. शनिवारी अँम्ब्युलन्स न मिळाल्याने एका युवकाने त्याच्या वडिलांचा मृतदेह कारच्या छतावर बांधून स्मशानभूमीकडे नेतानाचा दृश्य पाहायला मिळालं.

जयपूर हाऊस येथे राहणाऱ्या मोहित यांना अनेक प्रयत्न करूनही वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर अखेर मोहितने वडिलांचा मृतदेह कारच्या टपावर बांधून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत नेला. अंत्यसंस्कारासाठी वेळ आल्यानंतर कारच्या टपावरील मृतदेह काढताना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. ताजगंज स्मशानभूमीच्या विद्युत शवदहनात सलग २० तास मृतदेह जळत होते. शनिवारी याठिकाणी तब्बल ५० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले होते.

मृतदेहांची संख्या जशी वाढत होती तसं अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्यांचा रांगा वाढत होत्या. शनिवारी संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कारासाठी ६ तासांची वाट पाहावी लागत होती. स्मशानभूमीत सगळीकडे चिता जळत होत्या. विद्युत शवदहनही मोठ्या प्रमाणात सुरू होते. स्मशान भूमीचे प्रभारी संजीव कुमार गुप्ता म्हणाले की, याठिकाणी मृतदेहांचे प्रमाण वाढले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मृतदेहांना अग्नी दिला जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना कमीत कमी वेळ वाट पाहावी लागेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी २०-२० तास काम करत आहेत.

कैलास स्मशानभूमी येथे एका दिवसात १-२ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते त्याठिकाणी आता दिवसाला ७-८ मृतदेह येत आहेत. स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचारी जसवंतने सांगितले की, मागील दहा-पंधरा दिवसापासून मृतदेहांची संख्या वाढली आहे. इतक्या संख्येने मृतदेह कधी येत नव्हते. परंतु तीनपटीने मृतदेह स्मशानभूमीत येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या