शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
4
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
5
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
6
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
7
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
8
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
9
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
10
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
11
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
12
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
13
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
14
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
15
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
16
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
17
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
18
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
19
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
20
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!

Coronavirus: रुग्णवाहिका न मिळाल्यानं कारच्या टपावर वडिलांचा मृतदेह बांधून मुलगा स्मशानभूमीत पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 15:42 IST

जयपूर हाऊस येथे राहणाऱ्या मोहित यांना अनेक प्रयत्न करूनही वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही.

ठळक मुद्देअखेर मोहितने वडिलांचा मृतदेह कारच्या टपावर बांधून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत नेला.अंत्यसंस्कारासाठी वेळ आल्यानंतर कारच्या टपावरील मृतदेह काढताना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. एका दिवसात १-२ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते त्याठिकाणी आता दिवसाला ७-८ मृतदेह येत आहेत.

आग्रा – कोरोना महामारीचा कहर देशात पाहायला मिळत आहे. एकीकडे संक्रमण वाढत चाललं आहे तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. दिवसाला ४० पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मृतदेह स्मशानभूमीकडे घेऊन जाण्यासाठी अँम्ब्युलन्स मिळत नाहीत. एका एका अँम्ब्युलन्समध्ये ३-४ मृतदेह घेऊन जावं लागत आहे. शनिवारी अँम्ब्युलन्स न मिळाल्याने एका युवकाने त्याच्या वडिलांचा मृतदेह कारच्या छतावर बांधून स्मशानभूमीकडे नेतानाचा दृश्य पाहायला मिळालं.

जयपूर हाऊस येथे राहणाऱ्या मोहित यांना अनेक प्रयत्न करूनही वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर अखेर मोहितने वडिलांचा मृतदेह कारच्या टपावर बांधून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत नेला. अंत्यसंस्कारासाठी वेळ आल्यानंतर कारच्या टपावरील मृतदेह काढताना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. ताजगंज स्मशानभूमीच्या विद्युत शवदहनात सलग २० तास मृतदेह जळत होते. शनिवारी याठिकाणी तब्बल ५० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले होते.

मृतदेहांची संख्या जशी वाढत होती तसं अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्यांचा रांगा वाढत होत्या. शनिवारी संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कारासाठी ६ तासांची वाट पाहावी लागत होती. स्मशानभूमीत सगळीकडे चिता जळत होत्या. विद्युत शवदहनही मोठ्या प्रमाणात सुरू होते. स्मशान भूमीचे प्रभारी संजीव कुमार गुप्ता म्हणाले की, याठिकाणी मृतदेहांचे प्रमाण वाढले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मृतदेहांना अग्नी दिला जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना कमीत कमी वेळ वाट पाहावी लागेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी २०-२० तास काम करत आहेत.

कैलास स्मशानभूमी येथे एका दिवसात १-२ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते त्याठिकाणी आता दिवसाला ७-८ मृतदेह येत आहेत. स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचारी जसवंतने सांगितले की, मागील दहा-पंधरा दिवसापासून मृतदेहांची संख्या वाढली आहे. इतक्या संख्येने मृतदेह कधी येत नव्हते. परंतु तीनपटीने मृतदेह स्मशानभूमीत येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या