शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

Coronavirus: रुग्णवाहिका न मिळाल्यानं कारच्या टपावर वडिलांचा मृतदेह बांधून मुलगा स्मशानभूमीत पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 15:42 IST

जयपूर हाऊस येथे राहणाऱ्या मोहित यांना अनेक प्रयत्न करूनही वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही.

ठळक मुद्देअखेर मोहितने वडिलांचा मृतदेह कारच्या टपावर बांधून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत नेला.अंत्यसंस्कारासाठी वेळ आल्यानंतर कारच्या टपावरील मृतदेह काढताना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. एका दिवसात १-२ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते त्याठिकाणी आता दिवसाला ७-८ मृतदेह येत आहेत.

आग्रा – कोरोना महामारीचा कहर देशात पाहायला मिळत आहे. एकीकडे संक्रमण वाढत चाललं आहे तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. दिवसाला ४० पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मृतदेह स्मशानभूमीकडे घेऊन जाण्यासाठी अँम्ब्युलन्स मिळत नाहीत. एका एका अँम्ब्युलन्समध्ये ३-४ मृतदेह घेऊन जावं लागत आहे. शनिवारी अँम्ब्युलन्स न मिळाल्याने एका युवकाने त्याच्या वडिलांचा मृतदेह कारच्या छतावर बांधून स्मशानभूमीकडे नेतानाचा दृश्य पाहायला मिळालं.

जयपूर हाऊस येथे राहणाऱ्या मोहित यांना अनेक प्रयत्न करूनही वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर अखेर मोहितने वडिलांचा मृतदेह कारच्या टपावर बांधून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत नेला. अंत्यसंस्कारासाठी वेळ आल्यानंतर कारच्या टपावरील मृतदेह काढताना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. ताजगंज स्मशानभूमीच्या विद्युत शवदहनात सलग २० तास मृतदेह जळत होते. शनिवारी याठिकाणी तब्बल ५० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले होते.

मृतदेहांची संख्या जशी वाढत होती तसं अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्यांचा रांगा वाढत होत्या. शनिवारी संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कारासाठी ६ तासांची वाट पाहावी लागत होती. स्मशानभूमीत सगळीकडे चिता जळत होत्या. विद्युत शवदहनही मोठ्या प्रमाणात सुरू होते. स्मशान भूमीचे प्रभारी संजीव कुमार गुप्ता म्हणाले की, याठिकाणी मृतदेहांचे प्रमाण वाढले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मृतदेहांना अग्नी दिला जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना कमीत कमी वेळ वाट पाहावी लागेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी २०-२० तास काम करत आहेत.

कैलास स्मशानभूमी येथे एका दिवसात १-२ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते त्याठिकाणी आता दिवसाला ७-८ मृतदेह येत आहेत. स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचारी जसवंतने सांगितले की, मागील दहा-पंधरा दिवसापासून मृतदेहांची संख्या वाढली आहे. इतक्या संख्येने मृतदेह कधी येत नव्हते. परंतु तीनपटीने मृतदेह स्मशानभूमीत येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या