शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

coronavirus: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा १०० दिवसांपर्यंत प्रभाव जाणवणार, तब्बल २५ लाख नवे रुग्ण सापडणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 18:13 IST

SBI Reports on Coronavirus in India : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतची धक्कादायक माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णांची (Coronavirus in India) संख्या ही चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतची धक्कादायक माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टमधून (SBI Reports on Coronavirus in India)समोर आली आहे. या रिपोर्टनुसार देशातील कोरोनाची दुसरी लाट ही १०० दिवसांपर्यंत प्रभावी राहण्याची शक्यता आहे. बँकेने १५ फेब्रुवारीपासून कोरोनाच्या रुग्णांच्या मोजणीस सुरुवात केली आहे. २३ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये २५ लाखांपर्यंत रुग्ण सापडतील.  (Second wave of coronavirus to affect India for 100 days, 2.5 million new patients to be found, SBI Reports)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे. दररोजच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. २३ मार्चपर्यंतचा कल पाहिल्याच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील एकूण रुग्णांची संख्या २५ लाखांपर्यंत होऊ शकते. या रिपोर्टनुसार देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पिक हा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येईल.  कोरोनाला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कुठलाही खास प्रभाव दिसून येत नाही आहे. आता केवळ मोठ्या प्रमाणावरील लसीकरणा हाच कोरोनाविरोधातील या लढाईमध्ये लसीकरण हा एकच उपाय दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये त्याचा प्रभाव दिसून येत आहे, असेही या रिपोर्टमध्ये म्हटल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.   दरम्यान, अनेक राज्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा आणि लावलेल्या निर्बंधांचा प्रभाव पुढील महिन्यापासून दिसायला सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये हाय फ्रिक्वेंसी इंडिकेटर्सच्या आधारावरील बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्स घसरला आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवणे हाच या साथीविरोधातील एकमेव पर्याय उरला आहे. सध्या सुरू असलेल्या दररोजच्या ४० ते ४५ लाख लोकांच्या लसीकरणाच्या वेगाने ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण हे पुढील चार महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे.  

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ५३ हजार ५ृ४७६ नवे रुग्ण सापडले आहेत. ही गेल्या पाच महिन्यांमध्ये देशात सापडलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी देशातील १८ राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या डबल म्युटेट व्हेरिएंट मिळण्याबाबत चिंता व्यक्त करत लोकांना कोरोना गाइडलाइनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतSBIएसबीआय