शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus : ...अन् महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 10:36 IST

Coronavirus : गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे १.७० लाख कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

समस्तीपूर : कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा डॉकडाऊन सुरु आहे. दरम्यान या लॉकडाऊनमुळे देशातील गरीब जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे १.७० लाख कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, आता केंद्र सरकार आता २० कोटी महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करत आहे. बिहारमधील समस्तीपूर येथील जनधन बँक खातेधारक महिला केंद्र सरकारकडून मिळालेले पैसे काढण्यासाठी पोहोचल्या होत्या. 

समस्तीपूरमध्ये खाते नंबरच्या शेवटच्या अंकानुसार जनधनशी संबंधित महिलांच्या मोबाइलवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे मिळणारे ५०० रुपये जमा होत आहेत. त्यामुळे जनधन खात्यात जमा होणारे पैसे काढल्यानंतर समस्तीपूरमध्ये महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. तसेच, या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

दरम्यान, देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, प्रत्येक महिलेच्या जनधन बँक खात्यात दर महिना ५०० रुपये जमा होतील. ही प्रक्रिया तीन महिन्यापर्यंत चालू राहील. म्हणजेच, केंद्र सरकार महिलांच्या बँक खात्यात तीन महिन्यांत १५०० रुपये जमा करणार आहे. एकूण जनधन खात्यांपैकी ५३ टक्के महिलांच्या नावे आहे. त्यानुसार, जवळपास २० कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे. 

याचबरोबर, सोशल डिस्टेंसिंग लक्ष्यात घेऊन सर्वांना एकाचवेळी पैसे ट्रान्सफर करण्यात येत नाहीत. ज्या महिलांच्या जनधन बँक खाते क्रमांकातील शेवटचा अंक ०-१ आहे, त्यांच्या खात्यात ३ एप्रिलला आणि २-३ अंक असणाऱ्या धातेखारकांच्या बँक खात्यात ४ एप्रिलला पैसे जमा झाले आहेत. तसेच, ज्या लाभार्थींचा खाते क्रमांक  ४-५ आहे,  त्यांच्या खात्यात ७ एप्रिलला आणि ६-७ क्रमांकाच्या खात्यात ८ एप्रिल आणि ८-९ क्रमांक येणाऱ्या खातेधारकांच्या बँक खात्यात ९ एप्रिलला पैसे जमा होणार आहेत.

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात ३ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी