शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

CoronaVirus : ...अन् महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 10:36 IST

Coronavirus : गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे १.७० लाख कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

समस्तीपूर : कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा डॉकडाऊन सुरु आहे. दरम्यान या लॉकडाऊनमुळे देशातील गरीब जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे १.७० लाख कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, आता केंद्र सरकार आता २० कोटी महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करत आहे. बिहारमधील समस्तीपूर येथील जनधन बँक खातेधारक महिला केंद्र सरकारकडून मिळालेले पैसे काढण्यासाठी पोहोचल्या होत्या. 

समस्तीपूरमध्ये खाते नंबरच्या शेवटच्या अंकानुसार जनधनशी संबंधित महिलांच्या मोबाइलवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे मिळणारे ५०० रुपये जमा होत आहेत. त्यामुळे जनधन खात्यात जमा होणारे पैसे काढल्यानंतर समस्तीपूरमध्ये महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. तसेच, या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

दरम्यान, देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, प्रत्येक महिलेच्या जनधन बँक खात्यात दर महिना ५०० रुपये जमा होतील. ही प्रक्रिया तीन महिन्यापर्यंत चालू राहील. म्हणजेच, केंद्र सरकार महिलांच्या बँक खात्यात तीन महिन्यांत १५०० रुपये जमा करणार आहे. एकूण जनधन खात्यांपैकी ५३ टक्के महिलांच्या नावे आहे. त्यानुसार, जवळपास २० कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे. 

याचबरोबर, सोशल डिस्टेंसिंग लक्ष्यात घेऊन सर्वांना एकाचवेळी पैसे ट्रान्सफर करण्यात येत नाहीत. ज्या महिलांच्या जनधन बँक खाते क्रमांकातील शेवटचा अंक ०-१ आहे, त्यांच्या खात्यात ३ एप्रिलला आणि २-३ अंक असणाऱ्या धातेखारकांच्या बँक खात्यात ४ एप्रिलला पैसे जमा झाले आहेत. तसेच, ज्या लाभार्थींचा खाते क्रमांक  ४-५ आहे,  त्यांच्या खात्यात ७ एप्रिलला आणि ६-७ क्रमांकाच्या खात्यात ८ एप्रिल आणि ८-९ क्रमांक येणाऱ्या खातेधारकांच्या बँक खात्यात ९ एप्रिलला पैसे जमा होणार आहेत.

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात ३ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी