शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Coronavirus: मजुरांच्या परतीसाठी ३४ गाड्यांवर २४ कोटींचा खर्च; केरळ सरकारने केल्या ३ गाड्या रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 23:18 IST

केंद्र सरकार व भाजपने ८५ टक्के खर्च रेल्वे आणि १५ टक्के संबंधित राज्य सरकार उचलणार असल्याने मजुरांचा प्रवास मोफतच होणार आहे, असा दावा केला होता.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात देशभरातील विविध शहरात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना आपापल्या मूळगावी परत जाता यावे, यासाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष श्रमिक एक्स्प्रेस सोडल्या होत्या. या गाड्यांवर ३ मेपर्यंत रेल्वेला सुमारे २४ कोटी रुपये खर्च आला आहे. यातील २० कोटींचा खर्च रेल्वे उचलणार आहे, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली.३ मेपर्यंत रेल्वेने अशा एकूण ३४ विशेष गाड्या सोडल्या आहेत. या गाड्यांचा उरलेला खर्च संबंधित राज्य सरकारांनी उचलावयाचा आहे. या मजुरांना घरी पाठविण्याचा मुद्दा समोर येताच हा प्रवास खर्च कुणी करायचा, यावरून वादाला तोंड फुटले होते. हा खर्च मजुरांना भरायला लागू नये, असा सगळ्यांचा सूर होता. काँग्रेस पक्षाने तर आपल्या राज्यांमधील प्रदेश संघटनांना मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलण्यास सांगितले होते.केंद्र सरकार व भाजपने ८५ टक्के खर्च रेल्वे आणि १५ टक्के संबंधित राज्य सरकार उचलणार असल्याने मजुरांचा प्रवास मोफतच होणार आहे, असा दावा केला होता.पहिली रेल्वे गाडी १ मे रोजी १ हजार २२५ मजुरांना घेऊन तेलंगणहून झारखंडला रवाना झाली होती. येत्या काही दिवसांतही मजूर मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावाकडे जाणार असल्याने याचा मोठा खर्च रेल्वेला उचलावा लागणार आहे.बिहारसाठीच्या ३ गाड्या केरळ सरकारकडून रद्दतिरूअनंतपूरम : बिहारच्या स्थलांतरित मजुरांना परत नेण्यासाठी निश्चित केलेल्या तीन रेल्वेगाड्या केरळ सरकारने मंगळवारी रद्द केल्या. इतक्या मोठ्या संख्येने परतणाºया मजुरांची संख्या पाहता त्यांची आरोग्य तपासणी करण्यात बिहार सरकारने असमर्थता दाखवल्याने केरळ सरकारने हा निर्णय घेतला.

या तिन्ही रेल्वे बिहारच्या दरभंगा, दानापूर आणि मुझफ्फरपूर या जिल्ह्यात जाणार होत्या. मजुरांच्या याद्या बनवून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती; परंतु बिहार सरकारने आयत्या वेळी कारणे पुढे केल्याने या गाड्या रद्द केल्या आहेत.

या विशेष गाड्या कोळीकोडे, अलापुल्ला आणि तिरूर या जिल्ह्यातून सोडल्या जाणार होत्या. मूळगावी परतणाºया मजुरांना कोणतीही लागण झाली नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागते. जिथे परतणार आहे, त्या राज्याचे ना हरकत प्रमाणपत्रही निघण्यापूर्वी मिळणे आवश्यक असते. तिथे परतल्यानंतर मजुरांची पुन्हा तपासणी करून घरी पाठवायचे की क्वारंटाईन कक्षात ठेवायचे, हा निर्णय संबंधित राज्य सरकारने घ्यायचा असतो, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. अनेक राज्यांतून हे श्रमिक येणार आहेत. त्यातून कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये, यासाठी बिहार सरकारने आता क्वारन्टाइनची मुदत १४ ऐवजी २१ दिवस करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. 

बिहार : प्रत्येक ट्रेनमधून परतत आहेत १२०० मजूरया मजुरांच्या तिकीट भाड्याच्या आकारणीवरून सध्या वाद सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मजुरांच्या तिकीटापोटी आलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करून त्यांना मूळ गावी जाण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. मजुरांना परतण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडणे सुरू केल्यापासून बिहारमध्ये प्रत्येक ट्रेनमागे सुमारे १२०० मजूर परतत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या