शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Coronavirus: शाळा पुन्हा सुरु करा, मुलांना कोरोनाचा जास्त धोका नाही; WHO चं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 22:36 IST

मुलांचे शिक्षणच नव्हे तर संपूर्ण विकासही शाळेत होतो. मागील २ वर्षापासून त्याचं खूप नुकसान झालं आहे.

नवी दिल्ली – कोरोना संक्रमणाच्या भीतीनं शाळा बंद ठेवणं योग्य नाही. मागील २ वर्षांपासून मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकास बंद झाला आहे. मुलांना कोरोनापासून जितका धोका नाही तितका या गोष्टीमुळे आहे. शाळा बंद करण्याला प्राधान्य सर्वात शेवटी आलं पाहिजे आणि उघडण्याचं प्राधान्य सर्वात आधी हवं. २ वर्षाच्या कोरोना संक्रमणात लहान मुलं सर्वात कमी प्रभावित झाल्याचं विधान WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केले आहे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, जरी मुलं संक्रमित झाली तरी जास्त आजारी पडणार नाहीत. त्यामुळे आवश्यक काळजी घेत शाळा सुरु करायला हव्यात. शाळा सुरु करण्याबाबत सरकार आणि पालकांनी विचार करायला हवा कारण ओमायक्रॉन कोरोनाचा अखेरचा व्हेरिएंट नाही. भविष्यात कोरोनाचे आणखी व्हेरिएंट समोर येऊ शकतात. जर भविष्यात पुन्हा संक्रमण वाढले तर प्राधान्यक्रमे काय बंद करायला हवे याचा विचार करायला हवा असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मुलांचे शिक्षणच नव्हे तर संपूर्ण विकासही शाळेत होतो. मागील २ वर्षापासून त्याचं खूप नुकसान झालं आहे. हे खूप काळ सोसलेलं नुकसान आहे. त्यामुळे शक्य असेल त्या शाळा सुरु ठेवाव्यात असा सल्ला जगातील सर्व सरकारांना आहे. विना व्हॅक्सिनेशन मुलांना शाळेत पाठवणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न पालकांना पडतो. परंतु होय आपण पाठवू शकता. कारण गेल्या २ वर्षापासून संक्रमण पाहत आहोत त्यात मुलं संक्रमित झाले तरीही जास्त आजारी पडले नाहीत ही चांगली गोष्ट आहे. खूप कमी मुलं आहेत ज्यांना आधीपासून आजार आहे त्यांना धोकादायक आहे असंही डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.

तसेच निरोगी सामान्य मुलांना कोरोनापासून धोका कमी आहे. मुलांना धोका आजारापासून नव्हे तर गेल्या २ वर्षापासून बौद्धिक विकास खुंटला आहे. त्याने जास्त आहे. शाळेत गेल्यामुळे काही संक्रमण होऊ शकतं परंतु त्यापासून वाचण्यासाठीच ६ वर्षावरील मुलांना मास्क परिधान करणं आवश्यक आहे असंही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना