शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

Coronavirus: शाळा पुन्हा सुरु करा, मुलांना कोरोनाचा जास्त धोका नाही; WHO चं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 22:36 IST

मुलांचे शिक्षणच नव्हे तर संपूर्ण विकासही शाळेत होतो. मागील २ वर्षापासून त्याचं खूप नुकसान झालं आहे.

नवी दिल्ली – कोरोना संक्रमणाच्या भीतीनं शाळा बंद ठेवणं योग्य नाही. मागील २ वर्षांपासून मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकास बंद झाला आहे. मुलांना कोरोनापासून जितका धोका नाही तितका या गोष्टीमुळे आहे. शाळा बंद करण्याला प्राधान्य सर्वात शेवटी आलं पाहिजे आणि उघडण्याचं प्राधान्य सर्वात आधी हवं. २ वर्षाच्या कोरोना संक्रमणात लहान मुलं सर्वात कमी प्रभावित झाल्याचं विधान WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केले आहे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, जरी मुलं संक्रमित झाली तरी जास्त आजारी पडणार नाहीत. त्यामुळे आवश्यक काळजी घेत शाळा सुरु करायला हव्यात. शाळा सुरु करण्याबाबत सरकार आणि पालकांनी विचार करायला हवा कारण ओमायक्रॉन कोरोनाचा अखेरचा व्हेरिएंट नाही. भविष्यात कोरोनाचे आणखी व्हेरिएंट समोर येऊ शकतात. जर भविष्यात पुन्हा संक्रमण वाढले तर प्राधान्यक्रमे काय बंद करायला हवे याचा विचार करायला हवा असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मुलांचे शिक्षणच नव्हे तर संपूर्ण विकासही शाळेत होतो. मागील २ वर्षापासून त्याचं खूप नुकसान झालं आहे. हे खूप काळ सोसलेलं नुकसान आहे. त्यामुळे शक्य असेल त्या शाळा सुरु ठेवाव्यात असा सल्ला जगातील सर्व सरकारांना आहे. विना व्हॅक्सिनेशन मुलांना शाळेत पाठवणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न पालकांना पडतो. परंतु होय आपण पाठवू शकता. कारण गेल्या २ वर्षापासून संक्रमण पाहत आहोत त्यात मुलं संक्रमित झाले तरीही जास्त आजारी पडले नाहीत ही चांगली गोष्ट आहे. खूप कमी मुलं आहेत ज्यांना आधीपासून आजार आहे त्यांना धोकादायक आहे असंही डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.

तसेच निरोगी सामान्य मुलांना कोरोनापासून धोका कमी आहे. मुलांना धोका आजारापासून नव्हे तर गेल्या २ वर्षापासून बौद्धिक विकास खुंटला आहे. त्याने जास्त आहे. शाळेत गेल्यामुळे काही संक्रमण होऊ शकतं परंतु त्यापासून वाचण्यासाठीच ६ वर्षावरील मुलांना मास्क परिधान करणं आवश्यक आहे असंही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना