शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

coronavirus: जिल्हाधिकारी अन् पोलीस अधिक्षकांनीच काढली  रॅली, थाळी वादन अन् शंखनाद व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 11:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार पोलीस, डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्चमाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायंकाळी ५ वाजता देश एकत्र झाल्याचे पाहायला मिळाले.

इंदौर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार देशवासियांनी २२ मार्च रोजी जनत कर्फ्युचं पालन केलं. कोरोनासारख्या भयानक विषाणूचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचं या नागरिकांनी घरात बसून दाखवून दिलं. मात्र, सायंकाळी ५ वाजता एकत्र येऊन थाळीनाद, शंखनाद, टाळ्या वाजवणे आणि सेलिब्रेशन करणे, असे काही प्रकार घडल्याने या जनता कर्फ्युला गालबोट लागलंय. याबद्दल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनीही रस्त्यावर उतरुन शंख  आणि थाळी वाजवून लोकांसमवेत एकत्र येत कृतज्ञता व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार पोलीस, डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्चमाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायंकाळी ५ वाजता देश एकत्र झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या घराबाहेर, खिडकीत उभे राहून नागरिकांनी टाळी, थाळी, शंख नाद करुन अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, याच काळात देशातील अनेक भागात लोक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी तिरंगा झेंडा हातात  घेऊन जणू वर्ल्डकपची मॅचच भारताने जिंकली, असे सेलिब्रेशन केले. याबातचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील पीलभीत जिल्ह्यात चक्क जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनीच शंख वाजवत रॅली काढल्याचे पाहायला मिळाले. लोकांनी एकत्र येऊ नये, सुरक्षित अंतर ठेऊन राहावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी नियम न पाळल्याचे दिसून आले. 

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओबाबत पीलीभीत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. एकतर्फा बातम्या चालविण्यात आल्या आहेत. पीलीभीतमध्ये अनेक ठिकाणी लोकं एकत्र जमले होते. त्यांच्यावर दवाब किंवा सक्तीचा प्रयोग शक्य नव्हता. त्यामुळे लोकांमध्ये मिसळूनच त्यांना याबाबत सांगण्यात आल्याचे पीलीभीत पोलिसांनी म्हटले आहे. 

दरम्यान, रविवारी जनता कर्फ्यूनिमित्त कडकडीत बंद पाळून देशातील जनतेने कोरोधाविरोधात लढण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. मात्र जनता कर्फ्यूला एक दिवस उलटतो न उलटतो तोच कोरोनाबाबतचे लोकांमधील गांभीर्य हरवले असून, लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मुंबईतील काही ठिकाणी वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संतप्त झाले असून, लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. 

 

टॅग्स :pilibhit-pcपीलीभीतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीViral Photosव्हायरल फोटोज्