शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

Coronavirus: केंद्र सरकारच्या लॉकडाऊन पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; मोदींच्या रणनीतीवर तज्ज्ञांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 09:34 IST

देशव्यापी लॉकडाऊन हटवणार की वाढवणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

ठळक मुद्देसरकारने फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन केलं असतं, तर बरं होतंदेशात कोरोनाग्रस्त वाढत असताना लॉकडाऊन हटवण्याचा विचार ना मजुरांची चिंता ना कामगारांची, नियोजन न करता केलं लॉकडाऊन

नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७० हजारांच्या वर पोहचली आहे तर २ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनभरापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु असूनही कोरोनाग्रस्तांचा वाढणारा आकडा केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अशातच सरकारने परराज्यात अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सुरु करत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे पण त्याचा तणाव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

देशव्यापी लॉकडाऊन हटवणार की वाढवणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. केंद्र सरकार लॉकडाऊनचे फायदे सांगत असले तरी देशाची अर्थव्यवस्थेला लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे हे सत्य कोणीही लपवू शकत नाही. माजी परराष्ट्र सचिव शशांक, कार्टूनिस्ट राजेंद्र धोडपकर तसेच अनेक प्रतिष्ठित तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.  

लॉकडाऊन पॉलिसीमध्ये अनेक कमतरता समोर येत आहे. अर्थशास्त्री गुरचरण दास यांनीही लॉकडाऊन पॉलिसीबद्दल बरचं काही सांगितलं आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री पी. चिदंबरम हेदेखील केंद्र सरकारच्या धोरणांविरूद्ध आपली चिंता व्यक्त केली आहे.

राजेंद्र धोडपकर म्हणतात की, सरकारने फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन केलं असतं, तर बरं होतं. माजी परराष्ट्र सचिव शशांक यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने २५ मार्च २०२० पासून कोणतीही तयारी न करता विनाविलंब लॉकडाऊनची घोषणा केली. ना आरोग्य सेवा धोरण तयार केले, किंवा मध्यमवर्गाने एमएसएमईच्या समस्येबद्दल विचार केला नाही किंवा गरीब, मजूरांच्या स्थितीचे आकलन केले नाही असा आरोप त्यांनी केला.

या दरम्यान, ३० जानेवारीपासून परदेशातून सुमारे १४ लाख लोक आले आणि गेले. जगातील देशांनी लॉकडाऊनचे धोरण अवलंबिले. यावेळी त्यांनी कोविड -१९ च्या संसर्गाचा प्रसार, तपासणी व उपचार केले. आपल्याकडे याच्या विरुद्ध होत आहे. जेव्हा संक्रमण पसरते तेव्हा आम्ही लॉकडाऊन हटवणार आहोत. दररोज ४ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोना संसर्ग होत असल्याचं समोर येत आहे. तरीही गरीब-मजुरांविषयी राज्ये आणि केंद्र सरकारमध्ये वेगळी विचारसरणी दिसून येते असं धोडपकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारने कोविड -१९ संक्रमणाबद्दल सर्वप्रथम लोकांमध्ये भीती निर्माण केली. लोक घाबरून गेले. जर लॉकडाऊन लागू केले तर गरीब, कामगारांची चिंता केली नाही. गरीब मजुरांनी विचित्र परिस्थिती पाहून गावाकडे पलायन सुरु केले. जर सरकारी वाहन मिळालं तर ठीक अन्यथा पायपीट करु अशी भूमिका घेतली. आता जर तो घरी जात असेल तर तो इतक्या लवकर परत येणार नाही. जर गरीब मजूर नसतील तर उद्या नागरी जीवन, कारखाने, उद्योग, व्यवसाय सर्व कसे सुरू होतील. त्यामुळे सरकार आता दबावामुळे कामगारांना रोखण्यासाठी आर्थिक हालचाली सुरू करत आहे, लॉकडाऊन शिथिल करण्यासह पुढाकार घेत आहे असं धोडपकर आणि शशांक यांनी सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोनामुळे अमेरिकेत वाढला मृतांचा आकडा; तरीही ट्रम्प उचलणार ‘हे’धोकादायक पाऊल?

“सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे; लोक आपोआप कामधंद्याला लागतील”

चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

तरुणांनो, सावधान... पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये २० ते ६० दरम्यान सर्वाधिक रुग्ण

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या