शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: केंद्र सरकारच्या लॉकडाऊन पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; मोदींच्या रणनीतीवर तज्ज्ञांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 09:34 IST

देशव्यापी लॉकडाऊन हटवणार की वाढवणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

ठळक मुद्देसरकारने फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन केलं असतं, तर बरं होतंदेशात कोरोनाग्रस्त वाढत असताना लॉकडाऊन हटवण्याचा विचार ना मजुरांची चिंता ना कामगारांची, नियोजन न करता केलं लॉकडाऊन

नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७० हजारांच्या वर पोहचली आहे तर २ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनभरापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु असूनही कोरोनाग्रस्तांचा वाढणारा आकडा केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अशातच सरकारने परराज्यात अडकलेल्या मजुरांसाठी श्रमिक ट्रेन सुरु करत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे पण त्याचा तणाव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

देशव्यापी लॉकडाऊन हटवणार की वाढवणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. केंद्र सरकार लॉकडाऊनचे फायदे सांगत असले तरी देशाची अर्थव्यवस्थेला लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे हे सत्य कोणीही लपवू शकत नाही. माजी परराष्ट्र सचिव शशांक, कार्टूनिस्ट राजेंद्र धोडपकर तसेच अनेक प्रतिष्ठित तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.  

लॉकडाऊन पॉलिसीमध्ये अनेक कमतरता समोर येत आहे. अर्थशास्त्री गुरचरण दास यांनीही लॉकडाऊन पॉलिसीबद्दल बरचं काही सांगितलं आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री पी. चिदंबरम हेदेखील केंद्र सरकारच्या धोरणांविरूद्ध आपली चिंता व्यक्त केली आहे.

राजेंद्र धोडपकर म्हणतात की, सरकारने फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन केलं असतं, तर बरं होतं. माजी परराष्ट्र सचिव शशांक यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने २५ मार्च २०२० पासून कोणतीही तयारी न करता विनाविलंब लॉकडाऊनची घोषणा केली. ना आरोग्य सेवा धोरण तयार केले, किंवा मध्यमवर्गाने एमएसएमईच्या समस्येबद्दल विचार केला नाही किंवा गरीब, मजूरांच्या स्थितीचे आकलन केले नाही असा आरोप त्यांनी केला.

या दरम्यान, ३० जानेवारीपासून परदेशातून सुमारे १४ लाख लोक आले आणि गेले. जगातील देशांनी लॉकडाऊनचे धोरण अवलंबिले. यावेळी त्यांनी कोविड -१९ च्या संसर्गाचा प्रसार, तपासणी व उपचार केले. आपल्याकडे याच्या विरुद्ध होत आहे. जेव्हा संक्रमण पसरते तेव्हा आम्ही लॉकडाऊन हटवणार आहोत. दररोज ४ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोना संसर्ग होत असल्याचं समोर येत आहे. तरीही गरीब-मजुरांविषयी राज्ये आणि केंद्र सरकारमध्ये वेगळी विचारसरणी दिसून येते असं धोडपकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारने कोविड -१९ संक्रमणाबद्दल सर्वप्रथम लोकांमध्ये भीती निर्माण केली. लोक घाबरून गेले. जर लॉकडाऊन लागू केले तर गरीब, कामगारांची चिंता केली नाही. गरीब मजुरांनी विचित्र परिस्थिती पाहून गावाकडे पलायन सुरु केले. जर सरकारी वाहन मिळालं तर ठीक अन्यथा पायपीट करु अशी भूमिका घेतली. आता जर तो घरी जात असेल तर तो इतक्या लवकर परत येणार नाही. जर गरीब मजूर नसतील तर उद्या नागरी जीवन, कारखाने, उद्योग, व्यवसाय सर्व कसे सुरू होतील. त्यामुळे सरकार आता दबावामुळे कामगारांना रोखण्यासाठी आर्थिक हालचाली सुरू करत आहे, लॉकडाऊन शिथिल करण्यासह पुढाकार घेत आहे असं धोडपकर आणि शशांक यांनी सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोनामुळे अमेरिकेत वाढला मृतांचा आकडा; तरीही ट्रम्प उचलणार ‘हे’धोकादायक पाऊल?

“सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे; लोक आपोआप कामधंद्याला लागतील”

चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

तरुणांनो, सावधान... पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये २० ते ६० दरम्यान सर्वाधिक रुग्ण

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या