शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

Coronavirus : कर्तव्यनिष्ठा! २२ दिवसांच्या तान्हुल्या बाळासह आयुक्त जी. श्रीजना कर्तव्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 16:25 IST

Coronavirus : जी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत.

ठळक मुद्देजी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत.देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू  झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

विशाखापट्टणम : देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध योजना करण्यात येत आहेत. 

याचबरोबर, या कोरोनाच्या लढ्यात अनेक डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी खऱ्या अर्थाने कर्तव्य बजावत आहेत. अशाच प्रकारे विशाखापट्टणम महानगरपालिकेच्या (GVMC) आयुक्त जी. श्रीजना कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या लहान मुलासह मैदानात उतरल्या आहेत.

जी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत. जी. श्रीजना यांनी आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कर्तव्यावर परतावे लागले आहे. 

कार्यालयीन कामकाज आणि बाळाजी काळजी कशा प्रकारे घेता असा सवाल जी. श्रीजना यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, "माझे पती वकील आणि आई मला खूप मदत करतात. माझ्या मुलाला दुध पाजता यावे, यासाठी दर चार तासांनी घरी जाते आणि त्यानंतर पुन्हा कामावर परत येते. यावेळी माझे पती आणि आई बाळाची काळजी घेतात."

याचबरोबर, एक जबाबदार आणि प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी सांगितले की,  "या कठीण काळात कामावर राहाण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. या कठीण काळात आपत्कालीन सेवांची किती आवश्यकता आहे, हे सुद्धा माहीत आहे", असे जी. श्रीजना यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन विषाणूचा धोका रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करीत आहे. तसेच, जीव्हीएमसी स्वच्छतेविषयक कामे, व्हावीत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे जी. श्रीजना यांनी सांगितले. याशिवाय,  गरजूंना आवश्यक सुविधा पुरविणे. तसेच, विशाखापट्टनममध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांसोबत सर्व स्तरावर समन्वय साधणे. हाच कामाचा भाग आहे, असे जी. श्रीजना यांनी सांगितले. 

दरम्यान, भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू  झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३४ लोकांचा मृत्यू झाला  आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, या आजारापासून ७१६ रुग्ण बरे झाले आहेत. 

जगभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात १७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही पाच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १२ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या