शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कर्तव्यनिष्ठा! २२ दिवसांच्या तान्हुल्या बाळासह आयुक्त जी. श्रीजना कर्तव्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 16:25 IST

Coronavirus : जी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत.

ठळक मुद्देजी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत.देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू  झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

विशाखापट्टणम : देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध योजना करण्यात येत आहेत. 

याचबरोबर, या कोरोनाच्या लढ्यात अनेक डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी खऱ्या अर्थाने कर्तव्य बजावत आहेत. अशाच प्रकारे विशाखापट्टणम महानगरपालिकेच्या (GVMC) आयुक्त जी. श्रीजना कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या लहान मुलासह मैदानात उतरल्या आहेत.

जी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत. जी. श्रीजना यांनी आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कर्तव्यावर परतावे लागले आहे. 

कार्यालयीन कामकाज आणि बाळाजी काळजी कशा प्रकारे घेता असा सवाल जी. श्रीजना यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, "माझे पती वकील आणि आई मला खूप मदत करतात. माझ्या मुलाला दुध पाजता यावे, यासाठी दर चार तासांनी घरी जाते आणि त्यानंतर पुन्हा कामावर परत येते. यावेळी माझे पती आणि आई बाळाची काळजी घेतात."

याचबरोबर, एक जबाबदार आणि प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी सांगितले की,  "या कठीण काळात कामावर राहाण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. या कठीण काळात आपत्कालीन सेवांची किती आवश्यकता आहे, हे सुद्धा माहीत आहे", असे जी. श्रीजना यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन विषाणूचा धोका रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करीत आहे. तसेच, जीव्हीएमसी स्वच्छतेविषयक कामे, व्हावीत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे जी. श्रीजना यांनी सांगितले. याशिवाय,  गरजूंना आवश्यक सुविधा पुरविणे. तसेच, विशाखापट्टनममध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांसोबत सर्व स्तरावर समन्वय साधणे. हाच कामाचा भाग आहे, असे जी. श्रीजना यांनी सांगितले. 

दरम्यान, भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू  झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३४ लोकांचा मृत्यू झाला  आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, या आजारापासून ७१६ रुग्ण बरे झाले आहेत. 

जगभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात १७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही पाच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १२ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या