शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मोदींच्या 'थाळीनाद'नंतर आता घुमणार 'जयघोष'; २० एप्रिलला 'हर हर महादेव'च्या घोषणा देण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 14:29 IST

CoronaVirus :पंजाब काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे.

चंदीगड - देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पोलीस आणि सरकारी कर्मचारी एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. यांच्यासोबतची एकता आणि पंजाब सरकारच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी पंजाबकाँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे. 

पंजाब काँग्रेसने लोकांना २० एप्रिलला घरातच राहून 'जो बोले सो निहाल' आणि 'हर हर महादेव' अशा घोषणा देण्याचे आवाहन केले आहे. पंजाब काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी पत्रात म्हटले आहे की, "आम्ही पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी बऱ्यापैकी यशस्वी होत आहोत."

याचबरोबर, सुनील जाखड यांनी लिहिले आहे की, "मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहाय्यता निधी देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे आर्थिक संकट दूर होईल. यासाठी आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की, मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची मागणी केंद्र सरकारसमोर ठामपणे मांडण्यासाठी आणि पोलीस कर्मचारी, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत एकजुटता दाखवत २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता घरात राहून 'जो बोले सो निहाल' आणि हर हर महादेव अशा घोषणा द्याव्यात." 

पंजाबचे मुख्यंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याआधीही केंद्र सरकारकडे सहाय्यता निधीची मागणी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस जनता कर्फ्यू लागू करून संध्याकाळी कोरोनावर मात करण्याऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आयाबाई, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, पोलीस आदींसह अत्यावश्यक सेवेतील कामगार,कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या तसेच थाळीनाद करण्याचे आवाहन केले होते. 

देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. देशात आतापर्यंत १४३७८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९९१ नवे रुग्ण आढळले. तर ४३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करून १९९२ रुग्ण बरे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी