शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
4
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
5
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
6
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
7
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
8
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
9
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
10
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
11
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
12
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
13
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
14
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
15
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
16
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
17
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
18
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
19
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
20
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

CoronaVirus : मोदींच्या 'थाळीनाद'नंतर आता घुमणार 'जयघोष'; २० एप्रिलला 'हर हर महादेव'च्या घोषणा देण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 14:29 IST

CoronaVirus :पंजाब काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे.

चंदीगड - देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पोलीस आणि सरकारी कर्मचारी एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. यांच्यासोबतची एकता आणि पंजाब सरकारच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी पंजाबकाँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे. 

पंजाब काँग्रेसने लोकांना २० एप्रिलला घरातच राहून 'जो बोले सो निहाल' आणि 'हर हर महादेव' अशा घोषणा देण्याचे आवाहन केले आहे. पंजाब काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी पत्रात म्हटले आहे की, "आम्ही पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी बऱ्यापैकी यशस्वी होत आहोत."

याचबरोबर, सुनील जाखड यांनी लिहिले आहे की, "मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहाय्यता निधी देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे आर्थिक संकट दूर होईल. यासाठी आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की, मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची मागणी केंद्र सरकारसमोर ठामपणे मांडण्यासाठी आणि पोलीस कर्मचारी, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत एकजुटता दाखवत २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता घरात राहून 'जो बोले सो निहाल' आणि हर हर महादेव अशा घोषणा द्याव्यात." 

पंजाबचे मुख्यंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याआधीही केंद्र सरकारकडे सहाय्यता निधीची मागणी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस जनता कर्फ्यू लागू करून संध्याकाळी कोरोनावर मात करण्याऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आयाबाई, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, पोलीस आदींसह अत्यावश्यक सेवेतील कामगार,कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या तसेच थाळीनाद करण्याचे आवाहन केले होते. 

देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. देशात आतापर्यंत १४३७८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९९१ नवे रुग्ण आढळले. तर ४३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करून १९९२ रुग्ण बरे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी