शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

CoronaVirus : मोदींच्या 'थाळीनाद'नंतर आता घुमणार 'जयघोष'; २० एप्रिलला 'हर हर महादेव'च्या घोषणा देण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 14:29 IST

CoronaVirus :पंजाब काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे.

चंदीगड - देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पोलीस आणि सरकारी कर्मचारी एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. यांच्यासोबतची एकता आणि पंजाब सरकारच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी पंजाबकाँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे. 

पंजाब काँग्रेसने लोकांना २० एप्रिलला घरातच राहून 'जो बोले सो निहाल' आणि 'हर हर महादेव' अशा घोषणा देण्याचे आवाहन केले आहे. पंजाब काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी पत्रात म्हटले आहे की, "आम्ही पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी बऱ्यापैकी यशस्वी होत आहोत."

याचबरोबर, सुनील जाखड यांनी लिहिले आहे की, "मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहाय्यता निधी देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे आर्थिक संकट दूर होईल. यासाठी आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की, मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची मागणी केंद्र सरकारसमोर ठामपणे मांडण्यासाठी आणि पोलीस कर्मचारी, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत एकजुटता दाखवत २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता घरात राहून 'जो बोले सो निहाल' आणि हर हर महादेव अशा घोषणा द्याव्यात." 

पंजाबचे मुख्यंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याआधीही केंद्र सरकारकडे सहाय्यता निधीची मागणी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस जनता कर्फ्यू लागू करून संध्याकाळी कोरोनावर मात करण्याऱ्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आयाबाई, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, पोलीस आदींसह अत्यावश्यक सेवेतील कामगार,कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या तसेच थाळीनाद करण्याचे आवाहन केले होते. 

देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. देशात आतापर्यंत १४३७८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९९१ नवे रुग्ण आढळले. तर ४३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करून १९९२ रुग्ण बरे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी