शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी सांगितली 'मायक्रो लॉकडाऊन'ची कल्पना; मुख्यमंत्री लागू करणार?

By कुणाल गवाणकर | Updated: September 23, 2020 21:08 IST

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींचा सात मुख्यमंत्र्यांशी संवाद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही समावेश

नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधितांचा आकडा ५६ लाखांच्या पुढे गेला आहे. दररोज जवळपास ९० हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. देशातील ७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचादेखील समावेश होता. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधण्यात आलेल्या या संवादात मोदींनी नव्या रणनीतीवर भर देण्यास सांगितलं.'सुरुवातीला आपण देशात लॉकडाऊन केला. तो निर्णय अतिशय यशस्वी ठरला. संपूर्ण जगानं त्या निर्णयाचं कौतुक केलं. मात्र आता आपल्याला मायक्रो कन्टेंमेंट झोनवर लक्ष द्यायला हवं. एक-दोन दिवसांचा लोकल लॉकडाऊन केल्यास तो कोरोनाविरुद्धच्या लढाईत किती फायदेशीर ठरू शकतो, याचा विचार राज्यांनी करायला हवा. यामुळे तुमच्या राज्यातल्या आर्थिक व्यवहारांवर किती प्रभाव पडतो, याबद्दलचं मंथन करून निर्णय घ्यायला हवा,' असं मोदींनी सुचवलं.पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना मास्कच्या वापरावर पुन्हा जोर दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मास्क फायदेशीर ठरत असल्याचं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. त्यामुळे मास्क वापरणं सवयीचा भाग असायला हवा. अन्यथा आपण कोरोनाशी लढू शकणार नाही, असं मोदींनी म्हटलं.एका राज्यातून दुसऱ्या राज्यातून होणारा पुरवठा बाधित झाल्यास त्याचा परिणाम जनजीवनावर होतो. सध्या काही राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. राज्यांनी एकमेकांशी चांगला संवाद राखायला हवा. त्यातून संतुलन राखायला हवं, असा सल्ला मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिला. कोरोना विरुद्धच्या लढाईत देशानं संयम, संवेदना, संवाद आणि सहयोगाची भावना दाखवली आहे. ती कायम राखायला हवी. सामूहिक प्रयत्नांनीच आता आपल्याला आर्थिक आघाडीवरील लढाईदेखील जिंकायची आहे, असं मोदी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे