शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

CoronaVirus News: तेव्हा वाटलं होतं सगळंच संपलं; मोदींनी सांगितला १९ वर्षांपूर्वीचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 21:41 IST

CoronaVirus News: आपण कोरोनाच्या संकटातून नक्की बाहेर पडू; मोदींकडून विश्वास व्यक्त

नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मोदींनी या पॅकेजला स्वावलंबी भारत असं नाव दिलं. स्वावलंबी भारत पॅकेजमध्ये देशातल्या, अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्यात आला असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे. संपूर्ण जगानं अशी परिस्थिती पाहिलेली नाही. मात्र या संकटाचा वापर आपण संधी म्हणून करायला हवा, असं मोदी म्हणाले. कोरोना आधीचं जग आणि नंतरच जग याचा विचार केल्यास भारताला खूप मोठी संधी असल्याचं मोदींनी सांगितलं. आपण या कठीण काळावर मात करू. संकटातून मार्ग काढू, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.२१ व्या शतक भारताचं असेल असं म्हटलं जात होतं. आता आपल्याकडे तशी संधी आहे. आपण अधिकाधिक स्वावलंबी व्हायला हवं. आपल्या स्वावलंबाचा फायदा जगाला होईल. कारण आपलं स्वावलंबन म्हणजे आत्मकेंद्रीपणा नसेल, असं मोदी म्हणाले. आपण संकटातून नक्की बाहेर पडू, असं सांगताना मोदींनी २१ व्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या दोन संकटांचा उल्लेख केला.'२१ व्या शतकाची सुरुवात झाली. त्यावेळी Y2K संकट आलं. ते संकट त्यावेळी अभूतपूर्व होतं. मात्र आपल्या तंत्रज्ञांनी त्यातून मार्ग काढला. कारण आपल्याकडे उत्तम गुणवत्ता होती आणि आजही आहे. २००१ मध्ये कच्छमध्ये भूकंप झाला. तो भूकंप आम्ही पाहिला. सगळीकडे ढिगारे होते. सगळं उद्ध्वस्त झालं होतं. सगळंच संपलं असं वाटत होतं. परिस्थिती बदलेल असं वाटलंही नव्हतं. पण कच्छ उठून उभा राहिला. तो पुढे चालू लागला. त्यामुळे आपण निश्चय केला, तर कोणताही मार्ग अवघड नाही. देश नक्कीच स्वावलंबी होऊ शकतो,' असं मोदी म्हणाले. ...तरच भारत स्वावलंबी होईल; पंतप्रधान मोदींनी सांगितली पंचसुत्रीस्वावलंबी भारतासाठी एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणापंतप्रधान मोदींनी सांगितलंच, देशात 'असा' असेल लॉकडाऊनचा चौथा टप्पा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या