शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

CoronaVirus News: ...तरच भारत स्वावलंबी होईल; पंतप्रधान मोदींनी सांगितली पंचसुत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 21:47 IST

CoronaVirus news: कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर

नवी दिल्ली: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वावलंबी भारत पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात येईल. मात्र या पॅकेजमध्ये देशातल्या प्रत्येक घटकासाठी काही ना काही असेल, असं मोदी म्हणाले. सध्या जग अनुभवत असलेलं संकट अभूतपूर्व आहे. मात्र भारत याच संकटाचा वापर संधी म्हणून करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.स्वावलंबी भारत घडवण्याची पंचसुत्री पंतप्रधान मोदींनी सांगितली. स्वावलंबी भारताचे पाच प्रमुख स्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. 'स्वावलंबी भारत घडवण्यासाठी अर्थव्यवस्था, पायाभूत सोयीसुविधा, यंत्रणा, लोकसंख्याशास्त्र, मागणी यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. स्वावलंबी भारताचं स्वप्न साकारण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे. पायाभूत सोयीसुविधांना बकळटी द्यावी लागेल. स्वावलंबी भारतासाठी यंत्रणेत बदल करावे लागतील. ती अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही असायला हवी. लोकसंख्याशास्त्र आपलं सामर्थ्य आहे. तिचा पुरेपूर वापर करायला हवा. भारतीय बाजारातील मागणी हीदेखील आपली जमेची बाजू आहे. मागणी आणि पुरवठा साखळीतले सगळे घटक सशक्त करायला हवेत. त्यांचा पूर्ण क्षमतेनं वापर करण्याची गरज आहे,' असं मोदी म्हणाले.कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारनं आतापर्यंत केलेल्या आर्थिक घोषणा, रिझर्व्ह बँकेनं घेतलेले निर्णय आणि आता सरकारनं घोषित केलेलं स्वावलंबी भारत पॅकेज यांची बेरीज करता ते २० लाख कोटींचं असल्याचं मोदींनी सांगितलं. देशाच्या सकल उत्पन्नाच्या १० टक्के रकमेचं पॅकेज सरकार जाहीर करत असल्याचं मोदी म्हणाले. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेश पॅकेज तयार करण्यात आलं असून त्यामुळे अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला दिलासा मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी बोलून दाखवला.स्वावलंबी भारतासाठी एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणापंतप्रधान मोदींनी सांगितलंच, देशात 'असा' असेल लॉकडाऊनचा चौथा टप्पा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी