शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : मोदींनी मानले देशावासियांचे आभार, पंतप्रधानांनी पुन्हा केलंय नवं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 19:04 IST

रविवारी जनतेने स्वयंस्फूर्ती बंद पाळून कोरोना या संकटाला आम्ही पळवून लावणारच, असे दाखवून दिले.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशभरात नागरिकांनी दिवसभर घरात राहून जनता कर्फ्यु पाळला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. त्यास, नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर, मोदींच्या आवाहनानुसार देशातील कोरोना संकटाच्या काळात आपलं योगदान देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटनाद करत देशातील डॉक्टर्स आणि पोलिसांप्रति आदर व्यक्त केला. तसेच, वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दुमून गेला. देशावासियांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि कृतज्ञतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन देशवासियांची आभार मानले आहेत. 

नरेंद्र मोदींनी देशावासियांचे आभार मानले, तसेच करोना संकटकाळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व देशबांधवांनाही नमन केले. तर, कोरोनासोबतची आपली लढाई संपली असून आता खरी सुरुवात झाली आहे. त्यामुळे, नागरकिांनी घराबाहेर पडू नये. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही मोदींनी म्हटले. एका मोठ्या लढाईसाठी आपण एकमेकांपासून दूर पाहून या लढाईत आपलं योगदान देऊ, असेही पंतप्रधान यांनी ट्विट करुन म्हटलंय.

रविवारी जनतेने स्वयंस्फूर्ती बंद पाळून कोरोना या संकटाला आम्ही पळवून लावणारच, असे दाखवून दिले. नियमित जनता कर्फ्युनंतर लोकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटानाद करुन, शंख फुकून भारत माता की जय च्या घोषणा दिला. देशातील वातावरण या ५ मिनिटांसाठी स्फुर्तीमय बनले होते. कोरोना विषाणूचा अत्यंत झपाट्याने फैलाव होताना दिसत आहे. कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिवसभर जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी देशवासीयांना रविवारी म्हणजे 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्यास सांगितलंय. कोरोनाच्या तिसऱ्या व अतिशय संवेदनशील टप्प्यावर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रत्येकाने प्रतिसाद दिल्याचे आज पाहायला मिळाले. 

दरम्यान, ‘लोकमत’नेही मोदी सरकारच्या या प्रयत्नांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे म्हटले होतेड. लोकांनी स्वत:हून संचारबंदीत सहभागी व्हावे. सरकार, प्रशासन व पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, दूधवाला, कचरावेचक, सकाळी रोज घराघरांत जाऊन पेपर टाकणारे हे सारे आपल्यासाठी झटत आहेत. पाच मिनिटांचा वेळ काढून थाळी नाद, घंटानाद, शंखनाद करून ही महत्त्वाची भूमिका बजावू या. अशा व्यक्तींच्या कामगिरीला सलाम करायला हवा. कोरोनाविरुद्धच्या युद्धात प्रत्येकाने सैनिकाप्रमाणे लढू या आणि पाच मिनिटांचा वेळ काढू या, असे आवाहन लोकमते केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला देशातील नागरिकांनी उंदड प्रतिसाद दिला. तर, गाव-खेड्यातील नागरिकांपासून ते देशाच्या राजधानीपर्यंत सर्वांनीच आपलं पद, प्रतिष्ठा विसरुन कोरोना संकाटाचा मुकाबला करणाऱ्या लढवय्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईTwitterट्विटर