शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
4
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
5
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
6
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
7
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
8
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
9
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
10
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
11
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
12
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
13
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
14
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
15
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
16
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
17
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
18
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
19
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
20
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

coronavirus: 'माझ्या समाधीजवळ टाळ्या अन् थाळ्या वाजवा', राहुल गांधींनी 'ते' ट्विट रिट्विट केलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 16:54 IST

राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले आहे, की कोरोना व्हायरसमुळे छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजूरांना मोठा फटका बसला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच, कोरोना लॉक डाऊनकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता आपआपल्या घरातून टाळ्या वाजवण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले होते. त्यानुसार नागरिकांना प्रतिसादही दिला, पण अनेक ठिकाणी लोक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी कोरोनाच्या प्रादुर्भावावरुन पुन्हा  एकदा मोदींना लक्ष्य केलंय. टा

राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी लिहिले आहे, की कोरोना व्हायरसमुळे छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजूरांना मोठा फटका बसला आहे. टाळ्या वाजवून त्यांना मदत मिळणार नाही. त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आता, पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य करताना, कोरोनाचे गांभीर्य सरकारने यापूर्वीच लक्षात घ्यायला हवे होते, ते सरकारने घेतले नाही. आजच्या परिस्थितीचं मला दु:ख वाटतंय, कारण या स्थितीपासून आपण वाचू  शकलो असतो. आपल्याजवळ तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ होता. आपण या समस्येला गंभीरतेनं घ्यायला हवं होतं. त्यानुसार, तयारी करायला हवी होती, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. राहुल गांधी यांनी एका सरकारी महिला डॉक्टरचे ट्विट रिट्विट करत मोदींवर निशाणा साधला. 

रोहतक येथील सरकारी महिला डॉक्टर कामना कक्कर यांनी ट्वविट करुन मोदींपुढे आपले गाऱ्हाणे मांडेले होते. जेव्हा ते माझ्या समाधीवर येथील, कृपया त्यांना N९५ मास्क आणि ग्लोव्हज द्या. हो आणि टाळ्या आणि थाळ्याही वाजवा, असे तीव्र संतापजनक ट्विट कामना कक्कर यांनी केलं होत. कामनाच्या या ट्विटला रिट्विट करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. पण, हे अकाऊंट फेक असल्याचं अनेकांनी म्हटलं. विशेष म्हणजे याच महिन्यात हे अकाऊंट बनविण्यात आल्याचं ट्विटरवर दिसून येतंय.   

दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे राज्यात 31 मार्चपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केला. तर, देशभरातील ३० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्येही लॉक डाऊन आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटरdoctorडॉक्टर