शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

coronavirus: लढ्यात दिल्लीकर सरसावले; रोज २५ जणांचे प्लाझ्मा दान, दिल्लीतील स्थितीत सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 03:35 IST

केजरीवाल यांनी आरोग्य सचिवांना गेल्या दोन आठवड्यांमधील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत प्लाझ्मा बॅँक सुरु केल्यानंतर या बॅँकेत दररोज सरासरी २५ जणांचा प्लाझ्मा जमा होतो. गेल्या आठवडाभरात १०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आल्याची माहिती प्लाझ्मा बॅँकेच्या प्रवक्त्या डॉ. मिनू वाजपेयी यांनी लोकमतला दिली.दिल्लीतील आयएलबीएस संस्थेत प्लाझ्मा बॅँक सुरु करण्यात आली आहे. केजरीवालांच्या आवाहनानंतर कोविड-१९ मधून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करीत आहे. दात्यांची रोज सरासरी संख्या २५ आहे. एक व्यक्तीच्या प्लाझ्माने दोन रुग्णावर उपचार केले जातात. १०० व्यक्तींचा प्लाझ्मा बॅँकेत शिल्लक आहे. आठवडाभरात दिल्लीतील १०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आले आहेत.केजरीवाल यांनी आरोग्य सचिवांना गेल्या दोन आठवड्यांमधील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. देशात गेल्या दोन दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात देशातील कोरोनामुक्तीचा दर २.१ टक्क्यांनी वाढला आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण हळूहळू कमी होत असला तरी गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी ४०० हून अधिक कोरोनारुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारी देशभरात सकाळपर्यंत २२ हजार २५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. ४६७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. १५ हजार ५१५ रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ लाख १९ हजार ६६५ वर पोहचली आहे. यातील ४ लाख ३९ हजार ९४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, २ लाख ५९ हजार ५५७ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत २० हजार १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील १ कोटी ४ लाख ७३ हजार ७७१ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील २ लाख ६२ हजार ६७९ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देण्यात आली आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर बुधवारी ६१.५३ टक्के नोंदवण्यात आला.तपासण्या वाढल्या; मृत्यूदरात घटदिल्लीतील कोरोना बाधितांची स्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मान्य केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून दिल्ली सरकारनेही रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे सांगितले. तपासणीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. शिवाय मृत्युदरही घटला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली