शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लढ्यात दिल्लीकर सरसावले; रोज २५ जणांचे प्लाझ्मा दान, दिल्लीतील स्थितीत सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 03:35 IST

केजरीवाल यांनी आरोग्य सचिवांना गेल्या दोन आठवड्यांमधील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत प्लाझ्मा बॅँक सुरु केल्यानंतर या बॅँकेत दररोज सरासरी २५ जणांचा प्लाझ्मा जमा होतो. गेल्या आठवडाभरात १०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आल्याची माहिती प्लाझ्मा बॅँकेच्या प्रवक्त्या डॉ. मिनू वाजपेयी यांनी लोकमतला दिली.दिल्लीतील आयएलबीएस संस्थेत प्लाझ्मा बॅँक सुरु करण्यात आली आहे. केजरीवालांच्या आवाहनानंतर कोविड-१९ मधून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करीत आहे. दात्यांची रोज सरासरी संख्या २५ आहे. एक व्यक्तीच्या प्लाझ्माने दोन रुग्णावर उपचार केले जातात. १०० व्यक्तींचा प्लाझ्मा बॅँकेत शिल्लक आहे. आठवडाभरात दिल्लीतील १०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आले आहेत.केजरीवाल यांनी आरोग्य सचिवांना गेल्या दोन आठवड्यांमधील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. देशात गेल्या दोन दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात देशातील कोरोनामुक्तीचा दर २.१ टक्क्यांनी वाढला आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण हळूहळू कमी होत असला तरी गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी ४०० हून अधिक कोरोनारुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारी देशभरात सकाळपर्यंत २२ हजार २५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. ४६७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. १५ हजार ५१५ रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ लाख १९ हजार ६६५ वर पोहचली आहे. यातील ४ लाख ३९ हजार ९४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, २ लाख ५९ हजार ५५७ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत २० हजार १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील १ कोटी ४ लाख ७३ हजार ७७१ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील २ लाख ६२ हजार ६७९ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देण्यात आली आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर बुधवारी ६१.५३ टक्के नोंदवण्यात आला.तपासण्या वाढल्या; मृत्यूदरात घटदिल्लीतील कोरोना बाधितांची स्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मान्य केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून दिल्ली सरकारनेही रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे सांगितले. तपासणीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. शिवाय मृत्युदरही घटला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली