शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

coronavirus: लढ्यात दिल्लीकर सरसावले; रोज २५ जणांचे प्लाझ्मा दान, दिल्लीतील स्थितीत सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 03:35 IST

केजरीवाल यांनी आरोग्य सचिवांना गेल्या दोन आठवड्यांमधील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत प्लाझ्मा बॅँक सुरु केल्यानंतर या बॅँकेत दररोज सरासरी २५ जणांचा प्लाझ्मा जमा होतो. गेल्या आठवडाभरात १०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आल्याची माहिती प्लाझ्मा बॅँकेच्या प्रवक्त्या डॉ. मिनू वाजपेयी यांनी लोकमतला दिली.दिल्लीतील आयएलबीएस संस्थेत प्लाझ्मा बॅँक सुरु करण्यात आली आहे. केजरीवालांच्या आवाहनानंतर कोविड-१९ मधून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करीत आहे. दात्यांची रोज सरासरी संख्या २५ आहे. एक व्यक्तीच्या प्लाझ्माने दोन रुग्णावर उपचार केले जातात. १०० व्यक्तींचा प्लाझ्मा बॅँकेत शिल्लक आहे. आठवडाभरात दिल्लीतील १०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आले आहेत.केजरीवाल यांनी आरोग्य सचिवांना गेल्या दोन आठवड्यांमधील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. देशात गेल्या दोन दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात देशातील कोरोनामुक्तीचा दर २.१ टक्क्यांनी वाढला आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण हळूहळू कमी होत असला तरी गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी ४०० हून अधिक कोरोनारुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारी देशभरात सकाळपर्यंत २२ हजार २५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. ४६७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. १५ हजार ५१५ रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ लाख १९ हजार ६६५ वर पोहचली आहे. यातील ४ लाख ३९ हजार ९४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, २ लाख ५९ हजार ५५७ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत २० हजार १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील १ कोटी ४ लाख ७३ हजार ७७१ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील २ लाख ६२ हजार ६७९ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देण्यात आली आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर बुधवारी ६१.५३ टक्के नोंदवण्यात आला.तपासण्या वाढल्या; मृत्यूदरात घटदिल्लीतील कोरोना बाधितांची स्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मान्य केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून दिल्ली सरकारनेही रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे सांगितले. तपासणीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. शिवाय मृत्युदरही घटला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली