शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मोदी सरकारच्या ‘रणनीती’ने कोरोना हरेल?; 93 टक्के लोक म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 17:11 IST

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतातील कोरोना केसेसनी 21 हजाराचा आकडा ओलांडला आहे

ठळक मुद्देचीन, इटली, अमेरिकेत थैमान घालणाऱ्या कोरोनानं भारतावरही आक्रमण केलं आहे.जगातील अनेक देशांच्या तुलनेत आपल्याकडील कोरोना संसर्गाचा वेग कमी आहे.देशातील 93 टक्के जनतेला मोदी सरकारवर पूर्ण विश्वास असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

कोरोना व्हायरस या अदृश्य शत्रूविरोधात अख्खं जग लढतंय. भारतही या संकटाचा जिद्दीनं मुकाबला करतोय. वेगवेगळी राज्य सरकारं कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकारही भक्कम उभं आहे. सर्वच मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या पाठिंब्याबाबत अगदी जाहीरपणे समाधान व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर, 93 टक्के लोकांना मोदी सरकारवर विश्वास असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी करत असलेल्या प्रयत्नांमुळे आपण कोरोना संकटावर मात करू शकू, अशी खात्री जनतेला वाटतेय. 

आधी चीन, नंतर इटली, अमेरिकेसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूनं भारतावरही आक्रमण केलं असलं, तरी आपलं सरकार, प्रशासन आणि जनतेनं त्याला सर्व ताकदीनिशी रोखून धरल्याचं पाहायला मिळतंय. प्रचंड लोकसंख्या असूनही जगातील अनेक देशांच्या तुलनेत आपल्याकडील कोरोना संसर्गाचा वेग कमी आहे. कमी चाचण्या होणं, हेही त्यामागचं कारण असलं; तरी जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक राष्ट्रांनी, तज्ज्ञांनी भारताच्या प्रयत्नांना दाद दिली आहे. कालच, मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनीही भारताची पाठ थोपटलीय. केंद्र सरकारने अत्यंत योग्य वेळी लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचं अनेकांनी आर्वजून नमूद केलंय.

बिल गेट्स यांनी थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणाले...

संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताची प्रशंसा; मदतीचे कौतुक

जगभरातून भारताचं कौतुक होत असताना, भारतातील जनतेला काय वाटतं, मोदी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे कोरोनाविरुद्धची लढाई जिंकता येईल का, याबद्दल IANS आणि सी-व्होटर यांनी एक सर्व्हे केला. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारवरील जनतेचा विश्वास टप्प्याटप्प्याने वाढत गेला आहे. 25 मार्च रोजी नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर तो 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात, 76.8 टक्के जनतेला मोदी सरकारच्या प्रयत्नांबद्दल खात्री वाटत होती. हाच आकडा 21 एप्रिल रोजी 93.5 टक्के इतका आहे. 

31 मार्च रोजी 79.4 टक्के मतं मोदी सरकारच्या बाजूने पडली होती. त्यात 1 एप्रिलनंतर वेगानं  वाढ झाली. जसजशी लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी होऊ लागल्याचं जाणवू लागलं, तसतसा जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढत गेल्याचं या टक्केवारीतून स्पष्ट होतं.

अर्थात, देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतातील कोरोना केसेसनी 21 हजाराचा आकडा ओलांडला आहे आणि कोरोनाबळींची संख्या 681 झाली आहे. पुढे काय होऊ शकतं, याबद्दल मांडली जाणारी काही गणितं, अंदाज तर धडकी भरवणारे आहेत. अशा परिस्थितीत, जनतेला सरकारबद्दल वाटणारा विश्वास आशादायीच म्हणावा लागेल. कारण, नागरिकांच्या प्रतिसादाशिवाय, सहभागाशिवाय ही लढाई जिंकता येणारी नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाBill Gatesबिल गेटस