शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: १६ दिवसांतच दहा लाख रुग्ण; देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ३० लाखांच्या पार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:11 IST

विविध राज्यांत कोरोना बळींची संख्या याप्रमाणे आहे. तामिळनाडूमध्ये ६,४२०, कर्नाटकमध्ये ४,६१४, दिल्लीमध्ये ४,२८४, आंध्र प्रदेशमध्ये ३,१८९, गुजरातला २,८८१, उत्तर प्रदेशमध्ये २८६७, पश्चिम बंगालला २,७३७ व मध्यप्रदेशमध्ये १,२०६ जण मरण पावले आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे ६९,२३९ नवे रुग्ण आढळून आले असून, या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ३० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० लाख झाल्यानंतर त्यात १६ दिवसांतच आणखी दहा लाखांची भर पडली.

देशामध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३०,४४,४९० झाली असून, सुमारे २२,८०,५६६ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे रविवारी ९१० जण मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ५६,७०६ झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या १ लाख होण्यासाठी ११० दिवस लागले होते. ती संख्या १० लाख होण्यासाठी ५९ दिवस लागले होते. त्यानंतरच्या २१ दिवसांत ही संख्या २० लाख झाली.

कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.८६ इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात केलेली वाढ, त्यामुळे रुग्ण लवकर सापडण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे वेळीच उपचार होऊन मृत्यूदर कमी झाला आहे.सध्या देशामध्ये ७,०७,६६८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण २३.२४ टक्के आहे.विविध राज्यांत कोरोना बळींची संख्या याप्रमाणे आहे. तामिळनाडूमध्ये ६,४२०, कर्नाटकमध्ये ४,६१४, दिल्लीमध्ये ४,२८४, आंध्र प्रदेशमध्ये ३,१८९, गुजरातला २,८८१, उत्तर प्रदेशमध्ये २८६७, पश्चिम बंगालला २,७३७ व मध्यप्रदेशमध्ये १,२०६ जण मरण पावले आहेत.

३ कोटी ५२ लाख चाचण्याइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २२ आॅगस्ट रोजी देशभरात कोरोनाच्या ८,०१,१४७ चाचण्या झाल्या. त्यामुळे कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ३,५२,९२,२२० झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत