शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: आता आपल्याला कोरोनापासून केवळ देवच वाचवू शकतो, आरोग्यमंत्र्यांचे अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 09:15 IST

सुरुवातीच्या काही काळाता कोरोना नियंत्रणात राहिलेल्या कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

ठळक मुद्देकर्नाटक सरकार सुरुवातीच्या काळात कोरोनाला रोखण्यात कमालीचे यशस्वी ठरले होतेमात्र नंतर राज्यातील बाधितांचा आकडा झपाट्याने वाढला आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांवर पोहोचली आहे

बंगळुरू - देशातील कोरोना विषाणूचा फैलाव प्रचंड वेगाने वाढत असताना काही राज्यांमध्ये परिस्थिती अधिकाधिक चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच सुरुवातीच्या काही काळाता कोरोना नियंत्रणात राहिलेल्या कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यानंतर आता कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी अजब विधान केले आहे. कोरोनापासून बचावासाठी आता आम्हाला केवळ देवच मदत करू शकतो, अशा शब्दात हतबलता व्यक्त केली आहे.

कर्नाटक सरकार सुरुवातीच्या काळात कोरोनाला रोखण्यात कमालीचे यशस्वी ठरले होते. मात्र नंतर राज्यातील बाधितांचा आकडा झपाट्याने वाढला असून, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्र (२.७५ लाख), तामिळनाडू (१.५१ लाख) आणि दिल्ली (१.१६ लाख) या देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांनंतर कर्नाटक चौथ्या स्थानावर पोहोचले आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर श्रीरामुलू म्हणाले की, जगभरात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जागरुक राहण्याची गरज आहे. सत्ताधारी असो वा विरोधक, गरीब असो वा श्रीमंत हा विषाणू कुणासोबतही भेदभाव करू शकत नाही. राज्यातील परिस्थिती पाहता पुढील दोन महिने रुग्ण वाढीचा दर चढाच राहण्याची शक्यता आहे. आता सरकार किंवा मंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळे हा आजार फैलावत असल्याचा दावा कुणी करू शकतो. पण आता आपल्याला केवळ देवच वाचवू शकतो.

दरम्यान, येडियुरप्पा सरकारमधील वजनदार मंत्री असलेल्या श्रीरामुलू यांच्या विधानावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेले विधान हे कोरोनाविरोधात लढण्यास येडियुरप्पा सरकारला आलेल्या अपयशाला अधोरेखीत करत आहे. आम्हाला अशा सरकारची गरज नाही. अक्षम सरकारने जनतेला देवाच्या भरवशावर सोडले आहे, असे ट्वीट डी. के. शिवकुमार यांनी केले.

दरम्यान वाद वाढल्यानंतर श्रीरामुलू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की,  कोरोनाविरोधात लढण्यासाठी जनतेच्या सहकार्यासोबत देवाच्या मदतीचीही आम्हाला गरज आहे. जोपर्यंत कोरोनावर कुठली लस येत नाही तोपर्यंत केवळ देवच आपल्याला वाचवू शकतो, असे मला म्हणायचे होते. त्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकGovernmentसरकार