शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

coronavirus: आता आपल्याला कोरोनापासून केवळ देवच वाचवू शकतो, आरोग्यमंत्र्यांचे अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 09:15 IST

सुरुवातीच्या काही काळाता कोरोना नियंत्रणात राहिलेल्या कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

ठळक मुद्देकर्नाटक सरकार सुरुवातीच्या काळात कोरोनाला रोखण्यात कमालीचे यशस्वी ठरले होतेमात्र नंतर राज्यातील बाधितांचा आकडा झपाट्याने वाढला आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांवर पोहोचली आहे

बंगळुरू - देशातील कोरोना विषाणूचा फैलाव प्रचंड वेगाने वाढत असताना काही राज्यांमध्ये परिस्थिती अधिकाधिक चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच सुरुवातीच्या काही काळाता कोरोना नियंत्रणात राहिलेल्या कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यानंतर आता कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी अजब विधान केले आहे. कोरोनापासून बचावासाठी आता आम्हाला केवळ देवच मदत करू शकतो, अशा शब्दात हतबलता व्यक्त केली आहे.

कर्नाटक सरकार सुरुवातीच्या काळात कोरोनाला रोखण्यात कमालीचे यशस्वी ठरले होते. मात्र नंतर राज्यातील बाधितांचा आकडा झपाट्याने वाढला असून, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्र (२.७५ लाख), तामिळनाडू (१.५१ लाख) आणि दिल्ली (१.१६ लाख) या देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांनंतर कर्नाटक चौथ्या स्थानावर पोहोचले आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर श्रीरामुलू म्हणाले की, जगभरात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जागरुक राहण्याची गरज आहे. सत्ताधारी असो वा विरोधक, गरीब असो वा श्रीमंत हा विषाणू कुणासोबतही भेदभाव करू शकत नाही. राज्यातील परिस्थिती पाहता पुढील दोन महिने रुग्ण वाढीचा दर चढाच राहण्याची शक्यता आहे. आता सरकार किंवा मंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळे हा आजार फैलावत असल्याचा दावा कुणी करू शकतो. पण आता आपल्याला केवळ देवच वाचवू शकतो.

दरम्यान, येडियुरप्पा सरकारमधील वजनदार मंत्री असलेल्या श्रीरामुलू यांच्या विधानावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेले विधान हे कोरोनाविरोधात लढण्यास येडियुरप्पा सरकारला आलेल्या अपयशाला अधोरेखीत करत आहे. आम्हाला अशा सरकारची गरज नाही. अक्षम सरकारने जनतेला देवाच्या भरवशावर सोडले आहे, असे ट्वीट डी. के. शिवकुमार यांनी केले.

दरम्यान वाद वाढल्यानंतर श्रीरामुलू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की,  कोरोनाविरोधात लढण्यासाठी जनतेच्या सहकार्यासोबत देवाच्या मदतीचीही आम्हाला गरज आहे. जोपर्यंत कोरोनावर कुठली लस येत नाही तोपर्यंत केवळ देवच आपल्याला वाचवू शकतो, असे मला म्हणायचे होते. त्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकGovernmentसरकार