शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Coronavirus:राज्यांकडून पुरेशा चाचण्या नाहीत; महाराष्ट्राने चाचण्या वाढवण्याची गरज, केंद्र चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:21 IST

दिल्लीचा क्रमांक एक, बिहार, प. बंगाल, उत्तर प्रदेश पिछाडीवर

नवी दिल्ली : भारतात मंगळवारी कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) १२ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला आणि त्याचसोबत कोविड-१९ च्या रुग्णांची संख्याही लक्षणीय वाढली आहे.

इंडियन कॉन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चकडील (आयसीएमआर) माहितीनुसार पाच मे रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत ८४७१३ चाचण्या घेण्यात आल्या व त्यामुळे देशात एकूण जवळपास १२ लाख चाचण्या पूर्ण झाल्या. हा एक नवा विक्रम आहे. रोजच्यारोज चाचण्या होत असल्यामुळे कोविड-१९ चे रुग्णही रोजच्या रोज वाढत चालले आहेत. दुसरे म्हणजे राज्य सरकारेही वस्तुस्थितीवर भर देऊन कोविड-१९ चा आढावा घेत आहेत, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

पाच मे रोजी देशात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली व त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ४६४३३ झाली. हादेखील एक विक्रमच आहे. परंतु, ही काही काळजीची बाब नाही. कारण रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढून ती २७.४ टक्के झाली आहे. ही टक्केवारीही सर्वोच्च आहे.दुसºया बाजुने केंद्र सरकारची इच्छा ही लॉकडाऊनच्या दिवसांत देशातच चाचण्या वाढाव्यात अशी आहे. कारण कोविड-१९ ला तोंड देण्यासाठी त्याला योग्य अशी व्यूहरचना करता येईल. परंतु, राज्य सरकारे उदासीन आहेत. मग ते पंजाब असो की गुजरात. कारण या दोन्ही राज्यांत रुग्णांची वाढती संख्या काळजीचा विषय बनली आहे.

एवढेच काय मध्य प्रदेशदेखील पुरेशा चाचण्या करत नाही. महाराष्ट्रानेही पुरेशा चाचण्या करण्याची गरज आहे कारण संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच पुणे आणि व्यापारी राजधानी मुंबई या औद्योगिक शहरांवर अवलंबून आहे. मंत्री गटाची (आरोग्य) १४ वी बैठक मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली येथे झाली. आरोग्य योद्धे आणि रुग्णालयांना आवश्यक त्या वस्तुंचा पुरवठा करण्याचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.कोणत्या राज्यात किती चाचण्या?काळजीची बाब आहे ती राज्य सरकारे पुरेशा चाचण्या करीत नसल्याची. उदा. दिल्लीने देशात सर्वात जास्त चाचण्या (प्रत्येक दहा लाखांमागे ३४८६) केल्या तर महाराष्ट्रात हेच प्रमाण दर दहा लाखांमागे १४२३ आहे. पश्चिम बंगाल अगदी तळाशी (दर दहा लाखांमागे २३०) तर बिहारमध्ये हेच प्रमाण फक्त २६७ आहे. याचे मोठे कारण म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इतर राज्यांत अडकून पडलेल्या मजुरांना परत घेण्यास केलेला विरोध. उत्तर प्रदेशमध्ये या चाचण्यांचे प्रमाण दर दहा लाखांंमागे ४२९ एवढे कमी आहे. तेथे चाचण्यांचे प्रमाण वाढत नसल्यामुळे लॉकडाऊन मे महिनाच काय पण जूनमध्येही वाढवला जाऊ शकेल. पर्यायाने अर्थव्यवस्था लंगडी होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या