शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus:राज्यांकडून पुरेशा चाचण्या नाहीत; महाराष्ट्राने चाचण्या वाढवण्याची गरज, केंद्र चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:21 IST

दिल्लीचा क्रमांक एक, बिहार, प. बंगाल, उत्तर प्रदेश पिछाडीवर

नवी दिल्ली : भारतात मंगळवारी कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) १२ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला आणि त्याचसोबत कोविड-१९ च्या रुग्णांची संख्याही लक्षणीय वाढली आहे.

इंडियन कॉन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चकडील (आयसीएमआर) माहितीनुसार पाच मे रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत ८४७१३ चाचण्या घेण्यात आल्या व त्यामुळे देशात एकूण जवळपास १२ लाख चाचण्या पूर्ण झाल्या. हा एक नवा विक्रम आहे. रोजच्यारोज चाचण्या होत असल्यामुळे कोविड-१९ चे रुग्णही रोजच्या रोज वाढत चालले आहेत. दुसरे म्हणजे राज्य सरकारेही वस्तुस्थितीवर भर देऊन कोविड-१९ चा आढावा घेत आहेत, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

पाच मे रोजी देशात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली व त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ४६४३३ झाली. हादेखील एक विक्रमच आहे. परंतु, ही काही काळजीची बाब नाही. कारण रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढून ती २७.४ टक्के झाली आहे. ही टक्केवारीही सर्वोच्च आहे.दुसºया बाजुने केंद्र सरकारची इच्छा ही लॉकडाऊनच्या दिवसांत देशातच चाचण्या वाढाव्यात अशी आहे. कारण कोविड-१९ ला तोंड देण्यासाठी त्याला योग्य अशी व्यूहरचना करता येईल. परंतु, राज्य सरकारे उदासीन आहेत. मग ते पंजाब असो की गुजरात. कारण या दोन्ही राज्यांत रुग्णांची वाढती संख्या काळजीचा विषय बनली आहे.

एवढेच काय मध्य प्रदेशदेखील पुरेशा चाचण्या करत नाही. महाराष्ट्रानेही पुरेशा चाचण्या करण्याची गरज आहे कारण संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच पुणे आणि व्यापारी राजधानी मुंबई या औद्योगिक शहरांवर अवलंबून आहे. मंत्री गटाची (आरोग्य) १४ वी बैठक मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली येथे झाली. आरोग्य योद्धे आणि रुग्णालयांना आवश्यक त्या वस्तुंचा पुरवठा करण्याचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.कोणत्या राज्यात किती चाचण्या?काळजीची बाब आहे ती राज्य सरकारे पुरेशा चाचण्या करीत नसल्याची. उदा. दिल्लीने देशात सर्वात जास्त चाचण्या (प्रत्येक दहा लाखांमागे ३४८६) केल्या तर महाराष्ट्रात हेच प्रमाण दर दहा लाखांमागे १४२३ आहे. पश्चिम बंगाल अगदी तळाशी (दर दहा लाखांमागे २३०) तर बिहारमध्ये हेच प्रमाण फक्त २६७ आहे. याचे मोठे कारण म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इतर राज्यांत अडकून पडलेल्या मजुरांना परत घेण्यास केलेला विरोध. उत्तर प्रदेशमध्ये या चाचण्यांचे प्रमाण दर दहा लाखांंमागे ४२९ एवढे कमी आहे. तेथे चाचण्यांचे प्रमाण वाढत नसल्यामुळे लॉकडाऊन मे महिनाच काय पण जूनमध्येही वाढवला जाऊ शकेल. पर्यायाने अर्थव्यवस्था लंगडी होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या