शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Coronavirus: कोरोना काळात प्राणवायू टंचाईमुळे मृत्यू झालेला नाही, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची सभागृहात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 06:57 IST

Coronavirus: आतापर्यंत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात कोविड महामारी दरम्यान प्राणवायूच्या (ऑक्सिजन) टंचाईमुळे कोणाचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळालेला नाही, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले.

नवी दिल्ली : आतापर्यंत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात कोविड महामारी दरम्यान प्राणवायूच्या (ऑक्सिजन) टंचाईमुळे कोणाचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळालेला नाही, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले.

आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी शून्यकाळात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, केंद्र सरकार कोविड-१९ बाबत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून नियमित पाठवल्या जाणाऱ्या अहवालाच्या आधारावर एकूण रुग्ण आणि विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी ठेवते.डॉ. पवार म्हणाल्या की, केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अपेक्षित विवरण पाठवण्यास सांगितले आहे आणि २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या उत्तरांनुसार कोणतेही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने प्राणवायूच्या टंचाईमुळे मृत्यू झाल्याला दुजोरा दिलेला नाही.

कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारत पवार यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात मूळ प्रश्न काँग्रेसचे नीरज डांगी यांनी विचारला होता. कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. परंतु, काही तासातच ही घोषणा मागे घेण्यात आली. 

१२ वर्षांखालील मुलांचे लसीकरण१२ वर्षांखालील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय शास्त्रीय अभ्यास व तज्ज्ञ समितीने निर्णय घेतल्यानंतर घेतला जाईल, असेही डॉ. पवार यांनी काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंग यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

बुस्टरसाठी सक्ती नाही कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर बुस्टर मात्रा घेण्याची सक्ती नसल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी स्पष्ट केले. या संदर्भात शिवसेनेचे अनिल देसाई यांनी पूरक प्रश्न विचारला होता.

कोरोनाचे ७९५ रुग्णदेशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ७९५ रुग्ण आढळले, तर ५८ जणांचा मृत्यू झाला. या ५८ मृत्यूत केरळमधील ५६ जणांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत