शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

Coronavirus: कोरोना काळात प्राणवायू टंचाईमुळे मृत्यू झालेला नाही, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची सभागृहात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 06:57 IST

Coronavirus: आतापर्यंत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात कोविड महामारी दरम्यान प्राणवायूच्या (ऑक्सिजन) टंचाईमुळे कोणाचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळालेला नाही, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले.

नवी दिल्ली : आतापर्यंत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात कोविड महामारी दरम्यान प्राणवायूच्या (ऑक्सिजन) टंचाईमुळे कोणाचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळालेला नाही, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले.

आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी शून्यकाळात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, केंद्र सरकार कोविड-१९ बाबत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून नियमित पाठवल्या जाणाऱ्या अहवालाच्या आधारावर एकूण रुग्ण आणि विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी ठेवते.डॉ. पवार म्हणाल्या की, केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अपेक्षित विवरण पाठवण्यास सांगितले आहे आणि २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या उत्तरांनुसार कोणतेही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने प्राणवायूच्या टंचाईमुळे मृत्यू झाल्याला दुजोरा दिलेला नाही.

कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारत पवार यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात मूळ प्रश्न काँग्रेसचे नीरज डांगी यांनी विचारला होता. कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. परंतु, काही तासातच ही घोषणा मागे घेण्यात आली. 

१२ वर्षांखालील मुलांचे लसीकरण१२ वर्षांखालील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय शास्त्रीय अभ्यास व तज्ज्ञ समितीने निर्णय घेतल्यानंतर घेतला जाईल, असेही डॉ. पवार यांनी काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंग यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

बुस्टरसाठी सक्ती नाही कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर बुस्टर मात्रा घेण्याची सक्ती नसल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी स्पष्ट केले. या संदर्भात शिवसेनेचे अनिल देसाई यांनी पूरक प्रश्न विचारला होता.

कोरोनाचे ७९५ रुग्णदेशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ७९५ रुग्ण आढळले, तर ५८ जणांचा मृत्यू झाला. या ५८ मृत्यूत केरळमधील ५६ जणांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत