शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

CoronaVirus News: केंद्र द्विधा मन:स्थितीत; पंतप्रधान मोदींची अधिकाऱ्यांशी खलबते सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:14 IST

मुदतवाढ मिळाल्यास लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात होईल.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वाधिक रुग्ण असलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये भारत नवव्या क्रमांकावर आहे. देशात या आजाराचा फैलाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या स्थितीत रविवारी, ३१ मे रोजी संपत असलेल्या लॉकडाऊनला मुदतवाढ द्यावी की न द्यावी किंवा मुदतवाढ दिल्यास कधीपर्यंत द्यावी, या गोष्टींबाबत केंद्र सरकार द्विधा मन:स्थितीत आहे.

मुदतवाढ मिळाल्यास लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात होईल. लॉकडाऊनमधील स्थिती, कोरोना साथीचा फैलाव आदी गोष्टींबाबत गेल्या दोन दिवसांत काही बैठकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. लॉकडाऊनसंदर्भातील टास्क फोर्सचे प्रमुख तसेच केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला हे लॉकडाऊनला मुदतवाढ द्यायची की नाही, याबद्दल केंद्र सरकारला सादर करावयाच्या शिफारसींवर अंतिम हात फिरवत आहेत.

रेड, ऑरेंज, ग्रीन झोन ही संकल्पना बाद करून संसर्ग झालेल्या भागातच लॉकडाऊन लागू करण्यात यावा, अशीही एक शिफारस हा टास्क फोर्स करणार असल्याचे कळते. मात्र, दिल्लीमध्येच कोरोनाचा संसर्ग झालेले ९२ विभाग आहेत. मुंबई शहरातील ९६ टक्के भागांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. देशातील एकूण शहरांपैकी १३ शहरांमध्ये अशाच प्रकारची स्थिती असून, तेथील स्थितीचा कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी एका बैठकीत गुरुवारी आढावा घेतला. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीने केंद्र सरकारला शिफारसी सादर केल्याचे समजते.

डिस्टन्सिंगबाबत सरकारकडूनच नियमभंग

कोरोना साथ रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोरपणे पाळला जाणे आवश्यक असताना विशेष रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. विमानातही मधल्या आसनावर प्रवाशांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा रीतीने केंद्र सरकारकडूनच फिजिक ल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याबाबत हेळसांड होत असेल, तर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी भीती आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत आहे.

दारूची दुकाने, बाजारपेठा, कार्यालये, रस्त्यावर वाहनांची व माणसांची वाढणारी वर्दळ या गोष्टी कोरोनाचा विळखा आणखी घट्ट करू शकतात. लाखो स्थलांतरित मजूर आपापल्या गावात परतले असून, या हालचालींमुळे कोरोनाचा किती प्रसार झाला याचे परिणाम अजून पुरेशा प्रमाणात दिसायचे आहेत.

राज्यांना जास्त अधिकार देण्यास पंतप्रधान अनुकूल

साथ अशीच झपाट्याने पसरत राहिली, तर सर्वाधिक रुग्णांच्या संख्येबाबत पहिल्या दहा देशांमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर येईल, अशी आपत्कालीन व्यवस्थापनतज्ज्ञांना भीती वाटते. मात्र, निर्बंध उठविले गेले व संसर्ग झालेल्या क्षेत्रापुरताच लॉकडाऊन लागू करण्यात आला, तर आजवर व्यक्त केलेले अंदाज पुन्हा तपासून घेण्याची वेळ तज्ज्ञांवर येऊ शकते. केंद्रापेक्षा राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. या कामी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करीत आहेत.

धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल उघडण्याची मागणी : फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम कडकपणे पाळण्याच्या अटीवर शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे आदी पुन्हा उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्या क्षेत्रातील लोकांकडून केंद्र सरकारकडे केली जात आहे. लॉकडाऊनला रविवारी, ३१ मे रोजी ६९ दिवस पूर्ण होतील. कडक निर्बंधांमुळेच अर्थव्यवस्था रुळावर येईल, अशी स्थिती नाही. कोरोना साथीचे अस्तित्व लक्षात घेऊन त्याबरोबर जगण्यास नागरिकांनी आता शिकले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत