शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट किती भीषण? किती दिवस राहणार?; समोर आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 11:53 IST

CoronaVirus News: पुढील काही महिन्यांत देशात तिसऱ्या लाटेचा धोका

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मे महिन्यात देशात कोरोनानं हाहाकार माजवला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरू लागली. महिना संपेपर्यंत दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ४ लाखांच्या खाली आली. यानंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं याबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.आपलेही झाले परके! पतीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाने फिरवली पाठ; पत्नीने दिला मुखाग्नीकोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकीच भीषण असेल आणि तिचा जोर ९८ दिवस कायम राहील, अशी आकडेवारी एसबीआयच्या अहवालातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय अनुभव आणि तिथली आकडेवारी लक्षात घेऊन एसबीआयनं अहवाल तयार केला आहे. 'तिसऱ्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा फारशी वेगळी नसेल. मात्र व्यवस्थित पूर्वतयारी केल्यास जीवितहानी कमी करता येऊ शकेल,' असं एसबीआयनं अहवालात नमूद केलं आहे.कोव्हॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत; अनेकजण द्विधा मनस्थितीत'जगातील प्रमुख देशांचा विचार केल्यास तिसऱ्या लाटेचा कालावधी साधारणत: ९८ दिवसांचा राहिला आहे. तर दुसरी लाटेची तीव्रता सरासरी १०८ दिवस पाहायला मिळाली आहे,' अशी आकडेवारी एसबीआयच्या अहवालात आहे. एप्रिल-मेमध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट आली. मे महिन्यात लाटेनं टोक गाठलं. मेच्या पहिल्या आठवड्यात जवळपास दररोज ४ लाख कोरोना रुग्ण आढळून येत होते. मे महिन्यात देशात ९० लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याच देशात एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले नाहीत. गेल्या महिन्यात देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १.२ लाखांहून अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात एकूण १.७ लाख लोकांचा मृत्यू झाला. तिसऱ्या लाटेसाठी योग्य तयारी केल्यास हाच आकडा ४० हजारांपर्यंत आणता येईल. दुसऱ्या लाटेदरम्यान प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचं प्रमाण २० टक्के होतं. तिसऱ्या लाटेदरम्यान ते ५ टक्क्यांवर राहिल्यास जीवितहानी मोठ्या प्रमाणात टाळता येईल, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यासाठी आरोग्य सुविधा उभारण्यावर आणि लसीकरण मोहिमेला गतीमान करण्यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या