शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

CoronaVirus News : ३० जिल्हे, महापालिका क्षेत्रांत कडक निर्बंध राहणार; वाढत्या संसर्गामुळे कसलीही सूट नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:45 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : निवडलेले हे जिल्हे व महापालिका महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, तेलंगण, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब आदी राज्यांत आहेत.

नवी दिल्ली : देशभर लागू करण्यात आलेला तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन रविवारी संपुष्टात येत आहे. उद्यापासून (दि. १८ मे) देशात पुढचा लॉकडाऊन लागू करण्याआधी आरोग्य मंत्रालयाने सर्व वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन त्यावर चर्चा केली. यात देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण चिंताजनक असलेल्या ३० जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात कसलीही सवलत न देता कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.निवडलेले हे जिल्हे व महापालिका महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, तेलंगण, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब आदी राज्यांत आहेत. या ठिकाणी रुग्ण दुपटीचा दर, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आणि उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा झाली. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज सुमारे ३००० नवे बाधित आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर यापुढे लॉकडाउन पाळताना काही परिसरात विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.ही आहेत ती शहरेमहाराष्ट्र : मुंबई, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, पालघर, पुणे, सोलापूरगुजरात : वडोदरा, अहमदाबाद, सुरतमध्य प्रदेश : भोपाळ, इंदूरआंध्र प्रदेश : कुरनूलराजस्थान : जयपूर, जोधपूर, उदयपूरदिल्ली : बहुतांश रेजझोनओडिशा : बरहमपूरतमिळनाडू : विल्लुपुरम, चेंगलपट्टु, कुड्डालोर, आरियालुर, ग्रेटर चेन्नई, तिरुवल्लूरपश्चिम बंगाल : हावडा, कोलकातातेलंगण : ग्रेटर हैदराबादपंजाब : अमृतसरउत्तर प्रदेश : आग्रा, मेरठ४६ हजार कोरोनाबाधित देशातील केवळ ५ शहरांतदेशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर बनत चालली आहे. काही दिवसांपूर्वी ४० हजारांच्या आसपास असणारा बाधितांचा आकडा आज ९० हजारांच्याही पुढे गेला आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नई या पाच शहरांची स्थिती खूपच चिंताजनक आहे. या पाच शहरांतील बाधितांचा आकडा ४६ हजारांच्या आसपास आहे.विशेषत: केंद्राने लॉकडाऊनमध्ये काहीबाबतीत शिथिलता दिल्यानंतर हा आकडा वाढत चालला आहे. त्यात स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणावर मूळ गावी परतू लागल्याने बाधितांमध्ये भर पडत आहे. देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आज ५० दिवस पूर्ण झाले.गुजरातमध्ये शनिवारी आढळलेल्या १०५७ बाधितांपैकी ९७३ एकट्या अहमदाबादमधील आहेत. या शहरात ८१४४ जणांना ही बाधा झाली आहे, तर ४९३ जणांचा यात बळी गेला आहे. गुजरातमधील रुग्णांचा एकूण आकडा १० हजार ९८९ वर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीचा आकडा ९,३३३ वर गेला आहे. दिल्लीचा बहुतांश भाग रेड झोनमध्ये आहे. शनिवारी दिल्लीत नवे ४३८ रुग्ण आढळले. आतापर्यंत दिल्लीत १२९ जणांचा कोरोनांमुळे बळी गेला आहे.तमिळनाडूमध्ये ४७७ नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा १० हजार ५८५ वर पोहोचला आहे.महाराष्ट्रातील आकडाही झपाट्याने वाढत असून तो 30 हजार 706 हून अधिक झाला आहे. दिवसभरात नव्या 1606 रूग्णांचे निदान झाले. तर राज्यात 7 हजार 88 जण यातून पूर्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या