शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: मोदीजी, 'त्या' देशासोबतची हवाई वाहतूक लगेच रोखा; केजरीवालांनी सांगितला पुढचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:47 IST

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना; शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अजूनही देशात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार असून तिचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. सिंगापूरहून येणारी आणि सिंगापूरला जाणारी विमानं रोखा, अशी मागणी केजरीवालांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांचे गोडवे गाण्यासाठी अधिकाऱ्यांची तयारी; कार्यक्रमाआधी सामान्यांची शिकवणी'सिंगापूरमध्ये आढळून आलेलं कोरोनाचं नवं रूप लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक मानलं जात आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे मी सरकारला आवाहन करतो की सिंगापूरसोबत सुरू असलेली हवाई वाहतूक तात्काळ रोखण्यात यावी आणि लहान मुलांसाठी असलेल्या लसींच्या पर्यायांवर प्राधान्यानं कार्यवाही करण्यात यावी,' असं केजरीवालांनी ट्विट करून म्हटलं आहे. व्हेंटीलेटर न मिळाल्यानं वडिलांचा मृत्यू; मुलानं अंत्यदर्शनासाठी दुचाकीनं कापलं ७०० किमी अंतर, पण...कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहानग्यांना असल्यानं त्यादृष्टीनं आतापासूनच तयारी करण्यात यावी, असं आवाहन काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्राला केलं. 'येणाऱ्या दिवसांत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असेल. त्यामुळे त्यांचे उपचार, लसीकरणाचे प्रोटोकॉल आताच निश्चित व्हायला हवेत,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. देशाच्या भविष्यासाठी वर्तमानात मोदी सिस्टिमला झोपेतून जागं होण्याची गरज असल्याचं टीकास्त्रदेखील त्यांनी सोडलं होतं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी