शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus News: अडकून पडलेल्या व्यक्तींसाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 06:25 IST

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार ही रेल्वेसेवा सेवा सुरू करण्यात आली असून संबंधित दोन राज्यांच्या विनंतीवरून या रेल्वे धावतील.

नवी दिल्ली : परराज्यात अडकून पडलेले स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी ‘श्रमिक स्पेशल’ रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने कामगार दिनी घेतला. रेल्वे मंत्रालयातले कार्यकारी संचालक राजेश दत्त बाजपेयी यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार ही रेल्वेसेवा सेवा सुरू करण्यात आली असून संबंधित दोन राज्यांच्या विनंतीवरून या रेल्वे धावतील. ही पॉइंट टू पॉइंट सेवा असून ती दोन्ही राज्यांतील प्रत्येकी एक स्टेशन वगळता इतरत्र कुठेच थांबणार नाही.ज्या राज्यातून हे प्रवासी रवाना केले जातील त्यांनी प्रवाशांची तपासणी करायची असून ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे नसतील त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल. राज्य सरकारने या प्रवाशांना गटागटाने पूर्वनियोजित रेल्वे स्थानकांवर आणायचे असून त्यांच्या जेवणाची-पाण्याची सोय करायची आहे. प्रवास दीर्घ पल्ल्याचा असल्यास रेल्वेतर्फे त्यांना अन्नपुरवठा केला जाईल. प्रवासी पोहोचल्यानंतर त्या राज्याने त्यांची तपासणी तसेच विलगीकरण याबाबतचे निर्णय घ्यायचे आहेत.तेलंगणातील लिंगमपेल्ली येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घेऊन एक विशेष ट्रेन शुक्रवारी रवाना झाली. ती शनिवारी झारखंडमधील हातिया येथे पोहोचेल. त्यातून १२०० मजूर प्रवास करत आहेत. प्रवासादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग राहावे म्हणून एका डब्यात केवळ ५६ मजुरांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या