शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

CoronaVirus News: लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये १२.२ कोटी लोक बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 00:01 IST

देशातील गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेले सारे प्रयत्न लॉकडाऊनच्या काही महिन्यांमुळे फोल ठरणार आहेत.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग-धंदे बंद ठेवावे लागल्याने एप्रिल महिन्यामध्ये देशभरात १२.२ कोटी लोक बेकार झाले आहेत, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संघटनेने म्हटले आहे. बेकार झालेल्या लोकांमध्ये फेरीवाले, बांधकाम मजूर, रिक्षाचालक आदींचा समावेश आहे.

या संघटनेने यासंदर्भात नुकतीच एक पाहणी केली होती. आयपीइ ग्लोबल या संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक अश्वजित सिंग यांनी सांगितले की, देशातील गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेले सारे प्रयत्न लॉकडाऊनच्या काही महिन्यांमुळे फोल ठरणार आहेत. बेकारीच्या प्रमाणात यंदाच्या वर्षी घट होण्याची शक्यता नाही. भारतात कोरोनाच्या संसर्गापेक्षा भूकबळींची संख्या जास्त असेल असेही ते म्हणाले.

देशातील गरिबातल्या गरीब माणसाला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे आश्वासन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. कोरोना साथीमुळे देशात लॉकडाऊन लागू करावे लागणे ही मोदीसरकारसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीची गोष्ट ठरू शकते. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत विजय मिळवून मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. देशातील गरिबांसाठी गॅस सिलिंडर, वीज, गृहबांधणी अशा योजना पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकिर्दीत राबविल्याने नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकांत पुन्हा घवघवीत यश मिळाले होते.गरीबीचे प्रमाणही वाढणार

लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या बेकारीमुळे आणखी १०.४ कोटी लोक पुन्हा दारिद्रयरेषेखाली ढकलले जाणार आहेत. त्यामुळे देशात गरीबांची संख्या वाढणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात गरीबीचे प्रमाण कमी होऊन गरीबांची सर्वात जास्त संख्या असलेल्या देशांतून भारताचे नाव वगळले जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण लॉकडाऊनमुळे आता भारत पुन्हा गरीबीच्या भोवºयात सापडला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरीIndiaभारत