शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

CoronaVirus News: लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये १२.२ कोटी लोक बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 00:01 IST

देशातील गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेले सारे प्रयत्न लॉकडाऊनच्या काही महिन्यांमुळे फोल ठरणार आहेत.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग-धंदे बंद ठेवावे लागल्याने एप्रिल महिन्यामध्ये देशभरात १२.२ कोटी लोक बेकार झाले आहेत, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संघटनेने म्हटले आहे. बेकार झालेल्या लोकांमध्ये फेरीवाले, बांधकाम मजूर, रिक्षाचालक आदींचा समावेश आहे.

या संघटनेने यासंदर्भात नुकतीच एक पाहणी केली होती. आयपीइ ग्लोबल या संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक अश्वजित सिंग यांनी सांगितले की, देशातील गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेले सारे प्रयत्न लॉकडाऊनच्या काही महिन्यांमुळे फोल ठरणार आहेत. बेकारीच्या प्रमाणात यंदाच्या वर्षी घट होण्याची शक्यता नाही. भारतात कोरोनाच्या संसर्गापेक्षा भूकबळींची संख्या जास्त असेल असेही ते म्हणाले.

देशातील गरिबातल्या गरीब माणसाला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे आश्वासन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. कोरोना साथीमुळे देशात लॉकडाऊन लागू करावे लागणे ही मोदीसरकारसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीची गोष्ट ठरू शकते. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत विजय मिळवून मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. देशातील गरिबांसाठी गॅस सिलिंडर, वीज, गृहबांधणी अशा योजना पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकिर्दीत राबविल्याने नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकांत पुन्हा घवघवीत यश मिळाले होते.गरीबीचे प्रमाणही वाढणार

लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या बेकारीमुळे आणखी १०.४ कोटी लोक पुन्हा दारिद्रयरेषेखाली ढकलले जाणार आहेत. त्यामुळे देशात गरीबांची संख्या वाढणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात गरीबीचे प्रमाण कमी होऊन गरीबांची सर्वात जास्त संख्या असलेल्या देशांतून भारताचे नाव वगळले जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण लॉकडाऊनमुळे आता भारत पुन्हा गरीबीच्या भोवºयात सापडला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरीIndiaभारत