शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: चिंतेत भर! तिसऱ्या लाटेत 'त्या' जिल्ह्यांमध्ये असणार कोरोनाचा सर्वाधिक कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 09:56 IST

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरच्या राज्यांना महत्त्वपूर्ण सूचना

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले. त्यामुळे काही भागांत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. तिसऱ्या लाटेची भीती असताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लाटेची तीव्रता फारशी असणार नाही, असं आयसीएमआरनं सांगितलं आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा अनुभवलेल्या जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेत दिलासा मिळेल. या जिल्ह्यांमध्ये तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल, असा आयसीएमआरचा अभ्यास सांगतो.

तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्हा स्तरावर नियोजन करा आणि स्थानिक आकडेवारी विचारात घेऊन पावलं उचला, अशा सूचना आयसीएमआरनं राज्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये जिल्ह्यानुसार परिस्थिती बदलते. त्यामुळे जिल्हा पातळीवर नियोजन अतिशय महत्त्वाचं असल्याचं आयसीएमआरच्या महामारी आणि संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ महामारीतज्ज्ञ समीरन पांडा यांनी सांगितलं.

संपूर्ण राज्यात तिसरी लाट असं ढोबळपणे म्हणणं अयोग्य ठरेल. कारण सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम एकसारखाच असणार नाही. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी जिल्हा स्तरावर नियोजन गरजेचं आहे. याबद्दलचं व्यवस्थापन करण्यासाठी योजना आखायला हवी, असं पांडा म्हणाले. दुसऱ्या लाटेत ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप अधिक नव्हता, त्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लाटेत अधिक लोक अतिसंवेदनशील असतील. त्या व्यक्तींच्या समूहाचं लसीकरण लवकर करायला हवं, असं पांडांनी म्हटलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या