शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

CoronaVirus News: "आकड्यांमध्ये जाऊ नका, आकांडतांडव करून मेलेली माणसं जिवंत होणार नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 15:18 IST

CoronaVirus News: हरयाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांचं विधान

चंदिगढ: गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अनेक राज्यांमधील परिस्थिती भीषण होत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ते जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांपर्यंत अनेकांनी भारतातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील आरोग्य व्यवस्था सध्या व्हेंटिलेटरवर आहे. हरयाणादेखील याला अपवाद नाही. मात्र या परिस्थितीवर बोलताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धक्कादायक विधान केलं आहे. कोरोना संकटात मोठी मदत; इंग्लंडमधून भारतात पोहोचली 100 व्हेंटिलेटर, 95 ऑक्सिजन काँसंट्रेटरची पहिली खेपहरयाणातील कोरोना स्थिती, मृतांचा आकडा, त्यातील लपवाछपवी याबद्दल हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ही वेळ आकड्यांवर लक्ष देण्याची नाही. आमच्या आकांडतांडवानं मेलेली माणसं जिवंत होणार नाहीत, असं वक्तव्य खट्टर यांनी केलं. रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा कशा पोहोचतील याकडे आपण लक्ष द्यायला हवं. आम्ही त्याच उद्देशानं सध्या प्रयत्न करत आहोत, असं खट्टर म्हणाले.भयावह! मृत्यूनंतर तब्बल 21 तास घरातच पडून होता कोरोनाग्रस्ताचा मृतदेह; मग झालं असं काही...राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नाही. रुग्णांना हरतऱ्हेच्या सुविधा देण्यास राज्य सरकारचं प्राधान्य दिलं जात असल्याचं खट्टर यांनी सांगितलं. राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी खट्टर यांनी रोहतक, पानीपत, फरिदाबादचा दौरा केला. रेवाडी, गुरुग्राम आणि हिसारमध्ये गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्यावर राज्यात कुठेही वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नाही. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती खट्टर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या