शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

CoronaVirus News : काय सांगता? हातांच्या बोटांवरुन कळणार कोरोनाचा कितपत आहे धोका; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:38 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे.

जगभरात कोरोनाचा हाहकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 49 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाने आतापर्यंत 6,176,553 लोकांचा बळी गेला आहे. तर 491,858,699 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 426,858,976 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. आता हातांच्या बोटांवरून कळणार कोरोनाचा कितपत धोका आहे. रिसर्चमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शास्त्रज्ञांनी एक रिसर्च केला आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, एखाद्या व्यक्तीची नखं पाहून देखील एखाद्या व्यक्तीला कोरोना होण्याचा धोका किती आहे हे कळते. यासोबतच नखांबरोबर एखाद्या व्यक्तीच्या बोटांवरून त्याला कोरोनाचा किती धोका आहे हे कळू शकतं.

मीडिया रिपोर्ट्स आणि रिसर्चनुसार, ज्या लोकांची अनामिका (Ring Finger) तर्जनीपेक्षा (Index Finger) लहान आहे त्यांना गंभीर कोरोनाचा धोका जास्त असू शकतो. तज्ञांच्या मते, पोलंडमधील लॉड्झ मेडिकल युनिव्हर्सिटी आणि स्वीडनमधील कॅरोलिंस्का युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील संशोधकांच्या टीमने कोविड-19 ची लागण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या हार्मोन पातळीचा बरे होण्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी एक रिसर्च केला. छोटी अनामिका असलेल्या लोकांना कोरोनामुळे लवकरच रुग्णालयात दाखल करावे लागते असं देखील म्हटलं आहे. 

ज्या लोकांच्या उजव्या आणि डाव्या हाताच्या बोटांमध्ये फरक आहे त्यांच्यामध्येही व्हायरसची गंभीर लक्षणे आढळून आली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल चार कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (4 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 913 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5,21,358 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य