शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus News: सामाजिक अंतर राखल्यानेच होणार कोरोनाचे निर्मूलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 06:46 IST

तसेच सर्वांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे, असे या सहा कलमी कार्यक्रमात म्हटले आहे.

नवी दिल्ली : येत्या रविवारी लॉकडाऊन मागे घेण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, तसे झाल्यास देशाने आगामी काळात कसे मार्गाक्रमण करावे हे सांगणारा सहा कलमी कार्यक्रम नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) अमिताभ कांत यांनी सुचविला आहे. देशातील रेड झोनमधील निर्बंध अधिक कडक करावेत. तसेच सर्वांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे, असे या सहा कलमी कार्यक्रमात म्हटले आहे.अमिताभ कांत यांनी सहा कलमी कार्यक्रमातील पहिल्या मुद्द्यात म्हटले आहे की, रेड झोनमधील कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी तिथे लॉकडाऊन अत्यंत कडकपणे अमलात आणला पाहिजे. त्यांचा दुसरा मुद्दा तोंडाला मास्क बांधणे व फिजिकल डिस्टन्सिंग संदर्भातील आहे.कोरोना साथीचे निर्मूलन करायचे असल्यास ही बंधने नागरिकांनी पाळायलाच हवीत, असे कांत यांनी म्हटले आहे. तिसरा मुद्दा ही साथ पुन्हा फैलावण्याच्या धोक्याबद्दल आहे. ३० एप्रिल ते १५ मे या कालावधीत देशात कोरोना साथीचा दुसरा फेरा येण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी याआधीच दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमिताभ कांत यांनी सांगितले की, कोरोनाची साथ पुन्हा उद्भवण्याच्या शक्यतेपासून जनतेने खूप सावध राहिले पाहिजे. चौथ्या मुद्द्यात ते म्हणतात की, ६० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या व हृदयविकार, श्वसनाचे आजार, कर्करोग यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा कोरोनापासून बचावासाठी काळजी घेतली पाहिजे. अमिताभ कांत यांनी पाचव्या मुद्द्यात म्हटले आहे की, कोरोनावर औषध जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोवर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मानवजातीला असलेला धोका कायम राहील.>टप्प्याटप्प्याने आर्थिक व्यवहार सुरू व्हावेतनीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सहा कलमी कार्यक्रमाच्या अखेरच्या मुद्द्यामध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनमधील मुदतवाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारताचा विकासदर २०२० साली अवघा ०.२ टक्के इतका राहील, असे भाकित मुडीज या संस्थेने वर्तविले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिथे कोरोना साथीचा फार फैलाव नाही, अशा भागांमध्ये आर्थिक व्यवहार, उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने सुरू करावेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या