शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

CoronaVirus News: ...अन्यथा कोरोनाचा स्फोट; अजून किती महिने राहावं लागणार सतर्क?; एम्सच्या डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 19:09 IST

CoronaVirus News: देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका

नवी दिल्ली: भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. देशात सध्या दररोज जवळपास ४० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तर जगात हाच आकडा साडे पाच लाख इतका आहे. जगभरात कोरोनामुळे दररोज साडे आठ हजार जणांना जीव गमवावा लागत आहे. एका बाजूला कोरोनाचं संकट कायम असताना दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी, पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सर्वसामान्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

देशातील जनतेनं पुढील एक ते दीड वर्ष सतर्क राहायला हवं आणि कोरोना विषाणूचा पुन्हा होणारा स्फोट टाळायला हवा, असं एम्सच्या औषध विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांनी सांगितलं. 'सणांचा उद्देश आनंद वाटणं असतो. कोरोना वाटणं नव्हे. त्यामुळे पुढील १- वर्षे, जोपर्यंत महामारी नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत आपण महामारी पसरवण्यामागचं कारण ठरायला नको,' असं निश्चल म्हणाले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुढील १०० ते १२५ दिवस महत्त्वाचे असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर निश्चल यांचा इशारा महत्त्वाचा आहे.

देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही कोरोना संक्रमणाच्या दृष्टीनं संवेदनशील आहे. त्याचमुळे तिसऱ्या लाटेचा धोका वारंवार वर्तवला जातो, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. 'जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दररोज ५ लाखांहून रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळेच चांगली परिस्थिती बिघडत असल्याचं निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेनं नोंदवलं आहे,' असं पॉल म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या