शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

CoronaVirus News: कोरोनाचा आलेख खाली; भारतीयांची प्रतिकारशक्ती अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:41 IST

देशातील अन्य काही भागांतही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूंच्या संसर्गाबद्दल एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, देशातील काही भागांत कोरोनाने सर्वोच्च शिखर गाठले आहे असे सध्याच्या स्थितीवरून म्हणता येईल. मुंबई व अहमदाबाद या दोन शहरांमध्ये कोरोनाची सर्वोच्च पातळी येऊन गेल्याची शक्यता आहे. दिल्ली, मध्य मुंबई व अहमदाबादमध्ये सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर तेथील साथीचा आलेख काहीसा खाली येऊ लागला आहे.

देशातील अन्य काही भागांतही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे. मात्र काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आता वाढताना दिसत आहे. तिथे कोरोनाचा सर्वोच्च स्तर गाठून रुग्णसंख्या कमी होत जाण्यास काहीसा वेळ लागू शकेल.इतर देशांच्या तुलनेत भारत आणि मध्य आशियाई देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. कोरोनामुळे इटली आणि स्पेनमध्ये जे घडले आणि जे अमेरिकेत घडत आहे, ते भारतात घडलेले नाही, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. भारतीयांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आपोआप तयार झाली असावी, भारतात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर त्यामुळेच कमी झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

37148 नवे बाधित आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार १९१ वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत ५९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाच्या बळींचा आकडा 28084 झाला आहे. मात्र मृत्युदर आता अडीच टक्क्यांहून काहीसा खाली आला असून, अन्य देशांच्या तुलनेत हा खूपच कमी आहे.

देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. एकूण 1155191 रुग्णांपैकी ७ लाख २४ हजार ५७८ जणांनी या संसर्गजन्य आजारावर मात केली आहे आणि आजच्या घडीला ४ लाख २ हजार ५२९ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdocterडॉक्टर