शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

CoronaVirus News: कोरोनाचा आलेख खाली; भारतीयांची प्रतिकारशक्ती अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:41 IST

देशातील अन्य काही भागांतही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूंच्या संसर्गाबद्दल एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, देशातील काही भागांत कोरोनाने सर्वोच्च शिखर गाठले आहे असे सध्याच्या स्थितीवरून म्हणता येईल. मुंबई व अहमदाबाद या दोन शहरांमध्ये कोरोनाची सर्वोच्च पातळी येऊन गेल्याची शक्यता आहे. दिल्ली, मध्य मुंबई व अहमदाबादमध्ये सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर तेथील साथीचा आलेख काहीसा खाली येऊ लागला आहे.

देशातील अन्य काही भागांतही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे. मात्र काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आता वाढताना दिसत आहे. तिथे कोरोनाचा सर्वोच्च स्तर गाठून रुग्णसंख्या कमी होत जाण्यास काहीसा वेळ लागू शकेल.इतर देशांच्या तुलनेत भारत आणि मध्य आशियाई देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. कोरोनामुळे इटली आणि स्पेनमध्ये जे घडले आणि जे अमेरिकेत घडत आहे, ते भारतात घडलेले नाही, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. भारतीयांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आपोआप तयार झाली असावी, भारतात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर त्यामुळेच कमी झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

37148 नवे बाधित आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार १९१ वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत ५९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाच्या बळींचा आकडा 28084 झाला आहे. मात्र मृत्युदर आता अडीच टक्क्यांहून काहीसा खाली आला असून, अन्य देशांच्या तुलनेत हा खूपच कमी आहे.

देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. एकूण 1155191 रुग्णांपैकी ७ लाख २४ हजार ५७८ जणांनी या संसर्गजन्य आजारावर मात केली आहे आणि आजच्या घडीला ४ लाख २ हजार ५२९ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdocterडॉक्टर