शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

CoronaVirus News : कोरोनामुळे १२ कोटी मुले दारिद्र्याच्या खाईत जातील, ‘युनिसेफ’च्या अहवालात चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:28 IST

भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदिव व श्रीलंका या दक्षिण आशियाई देशात समाजातील खालच्या स्तरातील कुटुंबांची रोजीरोटी बंद झाल्याचा फटका त्यांच्या मुलांना सर्वाधिक बसत आहे.

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे भारतासह दक्षिण आशियाई देशातील पाच वर्षांहून कमी वयाची आणखी १२ कोटी मुले पुढील सहा महिन्यांत दारिद्र्याच्या खाईत लोटली जाऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी चिंता मुले व महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘युनिसेफ’ या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेने ताज्या अहवालात व्यक्त केली आहे.‘युनिसेफ’च्या भारतातील प्रतिनिधी यास्मिन हक हा अहवाल प्रसिद्ध करताना म्हणाल्या की, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदिव व श्रीलंका या दक्षिण आशियाई देशात समाजातील खालच्या स्तरातील कुटुंबांची रोजीरोटी बंद झाल्याचा फटका त्यांच्या मुलांना सर्वाधिक बसत आहे. सध्याच्या महामारीने यात आणखी १२ कोटींची भर पडून अशा संकटग्रस्त मुलांची संख्या ३६ कोटींवर पोहोचेल. अमेरिकेतील जॉन हॉफकिन्स ब्लूमबर्ग स्कूल आॅफ पब्लिक मेडिसिनने केलेल्या अभ्यासाचा हवाला देत अहवाल म्हणतो की, वाईटात वाईट परिस्थितीत दक्षिण आशियात पाच वर्षापर्यंतच्या वयाच्या ८.८१ लाख जास्त मुलांचा व ३६ हजार मातांचा पुढील वर्षभरात मृत्यू ओढवू शकेल. यापैकी सर्वाधिक मृत्यू भारत व पाकिस्तानातसंभवतात.>पोषण आहार, आर्थिक तरतुदीची मोठी गरजहक म्हणाल्या की, भारतापुरते बोलायचे तर बालकांचे कुपोषण ही येथे मोठी समस्या आहेच. सध्याच्या संकटामुळे यात भर पडणार आहे. त्यामुळे आंगणवाडी यंत्रणा अधिक मजबूत करून बालकांना पोषण आहार पुरविण्याची व त्यासाठी अधिक तरतूद व अधिक सोय करण्याची गरज आहे.