शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

CoronaVirus News : देशात कोरोना चाचण्या कमी; १० लाखांमागे फक्त २००७

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 05:35 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कटू सत्य हे आहे की, इतर देशांच्या तुलनेत भारत फार मागे आहे आणि त्याचा परिणाम असा की, कमी रुग्ण उघडकीस येत आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या गुरुवारी १.१२ लाखांवर गेली, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूची (कोविड-१९) बाधा होऊन दर दहा लाख लोकांमागे २.६४ मृत्यू असा दर २१ मे रोजी होता. जगात हा मृत्यू दर सगळ््यात कमी असावा. याशिवाय बाधित रुग्णांचे प्रमाणही युरोप, उत्तर अमेरिका, अफ्रिका आणि इतर देशांच्या तुलनेत दर दहा लाख लोकांमागे सगळ्यात कमी ८६ एवढे आहे. असे असले तरी तज्ज्ञ काळजीत पडले आहेत ते म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतात चाचण्यांचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे. येथे विकसित देशांचा विचार नाही.

एवढेच काय सगळे आफ्रिकन देश एकत्र केले तर त्यांनीही दर दहा लाख लोकांमागे २०८२ चाचण्या केल्या तर भारताने २१ मे रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडील (आयसीएमआर) माहितीनुसारदर दहा लाख लोकांमागे चाचण्या केल्या २००७. २१ एप्रिल रोजी भारताने ४.६२ लाख चाचण्या केल्या होत्या तर एक महिन्यानंतर त्याच्या सहापट म्हणजे २६.१५ लाख चाचण्या केल्या.

कटू सत्य हे आहे की, इतर देशांच्या तुलनेत भारत फार मागे आहे आणि त्याचा परिणाम असा की, कमी रुग्ण उघडकीस येत आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या गुरुवारी १.१२ लाखांवर गेली, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.अनेक राज्ये ही एक तर पुरेशा चाचण्या करत नाहीत किंवा माहिती लपवून ठेवतात ही तज्ज्ञांची काळजी आहे. चाचणीची व्यवस्था (सिस्टीम) ही खूप त्रासदायक व बोजड करण्यात आली आहे की, खासगी चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांना औपचारिकता पूर्ण करून चाचण्या घेणे खूप त्रासदायक झाले असे अहवाल सरकारकडे येत आहेत.

बºयाच खासगी प्रयोगशाळा त्यांच्या क्षमतेच्या फक्त २५ टक्के चाचण्या करत आहेत. दुसरे म्हणजे आयसीएमआरने रुग्णांची जर तयारी नसेल तर खासगी प्रयोगशाळांना चाचणी करण्यास मनाई केलेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, आयसीएमआरच्या नोडल अधिकाऱ्यांकडून परवानगी आणि औपचारिकता पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमुळे निष्कर्षांना विलंब होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या