शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

By कुणाल गवाणकर | Updated: November 20, 2020 16:13 IST

CoronaVirus News: दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; आरोग्य मंत्रालयाच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली: देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिवाळीच्या दिवसांत देशातल्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली होती. त्यावेळी आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांत देशातल्या काही राज्यांमधल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर हरयाणा, मणिपूर, गुजरात आणि राजस्थानात केंद्रानं आरोग्य पथकं पाठवली आहेत. आता आणखी काही राज्यांमध्येही वैद्यकीय पथकं पाठवण्याचा विचार केंद्राकडून सुरू आहे.कुठे कर्फ्यू तर कुठे शाळा बंद, मुंबईत पुन्हा खबरदारी; पुन्हा सुरु झाली लॉकडाऊनची तयारी?थंडीच्या दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यानं चाचण्यांचं प्रमाण वाढवा, असा सल्ला याआधीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिला आहे. कोरोनाचे रुग्ण जास्त व्यक्तींच्या संपर्कात येण्याआधी आरोग्य यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, यादृष्टीनं पावलं उचला. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी अभियानं राबवा, अशा सूचना आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारनं दिल्या आहेत. कोरोना रुग्ण वेळेत आढळून येत नसल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं निरीक्षण मंत्रालयानं नोंदवलं....म्हणून मुंबईत कोरोना घटला आणि दिल्लीत वाढला, तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारणकेंद्र सरकारची पथकं नेमकं काय करणार?केंद्र सरकारनं पाठवलेली पथकं कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांच्या दौरा करतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या आवश्यक योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम या पथकांकडून केलं जाईल. राज्याच्या आरोग्य यंत्रणेसोबत काम करून कोरोनाविरुद्धच्या लढाईचं व्यवस्थापन मजबूत करण्याची जबाबदारीदेखील या पथकांवर असेल. मनाली: लाहौल खोऱ्यातील एका गावात सर्वजण कोरोना पॉझिटीव्ह!दिल्लीतल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे. दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा परिणाम एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन), हरयाणा आणि राजस्थानातही दिसू लागला आहे. या भागांमधल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.महाराष्ट्र, दिल्लीनं चिंता वाढवलीमहाराष्ट्र आणि दिल्लीतील परिस्थिती केंद्रासाठी चिंताजनक ठरत आहे. महाराष्ट्रात काल कोरोनाचे ५ हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातल्या एकूण बाधितांचा आकडा १७ लाख ६३ हजार ५५ वर पोहोचला. काल राज्यात १५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ४६ हजार ३५६ इतकी झाली. तर दिल्लीत काल कोरोनाचे ७ हजार ५४६ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधितांचा आकडा ५.१ लाखाच्या पुढे गेला. राजधानीत काल कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ९८ इतकी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस