शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

CoronaVirus News : येत्या दोन ते तीन दिवसांत सरकार नवं पॅकेज देणार, नितीन गडकरींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 11:50 IST

येत्या दोन ते तीन दिवसांत नवं पॅकेज देणार असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री आणि एमएसएमई खात्याचे मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी दिली आहे. 

ठळक मुद्देटाळेबंदीमुळे उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत आहे. आता सरकार येत्या दोन ते तीन दिवसांत नवं पॅकेज देणार असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री आणि एमएसएमई खात्याचे मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी दिली आहे. कोरोनाच्या संकटात उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच दिलासादायक पॅकेज जाहीर करणार आहे.

नवी दिल्ली: कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतालाही याचा फटका बसला आहे. टाळेबंदीमुळे उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत आहे. आता सरकार येत्या दोन ते तीन दिवसांत नवं पॅकेज देणार असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री आणि एमएसएमई खात्याचे मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी दिली आहे. कोरोनाच्या संकटात उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच दिलासादायक पॅकेज जाहीर करणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेलंगणातील उद्योग व वाणिज्य सदस्यांशी झालेल्या संभाषणादरम्यान गडकरींनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, येत्या 2 ते 3 दिवसांत सरकार मदत पॅकेज जाहीर करेल. सरकारला आपल्या मर्यादा आहेत. प्रत्येकाला वाचवण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.अर्थ मंत्रालय व पीएमओ यांना शिफारसी पाठविण्यात आल्या नितीन गडकरी हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) खात्याचे मंत्रीदेखील आहेत. ते म्हणाले की, एमएसएमई मंत्रालयाने वित्त मंत्रालय व पंतप्रधान कार्यालया(पीएमओ)ला आपल्या शिफारसी पाठवल्या आहेत. लघु उद्योगांना वेळेवर थकबाकी परतावा मिळावा आणि त्यांच्या व्यवसायात अडचणी येऊ नयेत, यासाठी केंद्र सरकार 1 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजवर काम करत असल्याचंही गेल्या महिन्यात नितीन गडकरींनी सांगितलं होतं. एमएसएमई क्षेत्राला सरकारी पाठबळाची गजरलॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रावर झाला आहे. हे क्षेत्र देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि कोट्यवधी लोकांना रोजगार देते. गरीब, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांसाठी अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कित्येक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. परंतु असे असले तरी एमएसएमई क्षेत्राला बळ देण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. केंद्र सरकार सर्व उद्योगांना सतत पाठिंबा देत आहे. व्यावसायिकांनीही हे समजून घ्यावे लागेल की सरकारची आर्थिक स्थितीदेखील दडपणाखाली आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus : निसर्गाचा चमत्कार! बिजनौरहून स्पष्ट दिसतोय नैनितालचा पर्वत

चीनच्या हेलिकॉप्टर्सची LACच्या हद्दीत घुसखोरी, भारतीय IAF लढाऊ विमानांनी लावलं हुसकावून

दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार