शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

CoronaVirus News: सामूहिक संसर्ग नसल्याचा केंद्राचा दावा हास्यापद; विषाणूतज्ज्ञांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 06:37 IST

कोरोनाबद्दलचे धोरण पारदर्शक नाही; सामूहिक संसर्ग नक्कीच अस्तित्वात आहे

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या ११ लाखांवर पोहोचली असतानाही देशात सामूहिक संसर्ग नसल्याचा केंद्र सरकार करीत असलेला दावा खोटा व हास्यास्पद आहे, असा आरोप काही विषाणूतज्ज्ञ व आरोग्यतज्ज्ञांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर केला आहे. देशात काही दिवसांपूर्वीच सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली असल्याचा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.

लक्षद्वीप वगळता देशाच्या प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचे रुग्ण सध्या सापडत आहेत. कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात होण्याच्या टप्प्यापर्यंत या साथीचा अद्याप फैलाव झालेला नाही, असे केंद्र सरकारचे मत आहे. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी सांगितले की, सरकारचा दावा हास्यास्पद असून सामूहिक संसर्ग नक्कीच अस्तित्वात आहे. मात्र, ही वस्तुस्थिती मान्य करण्याची सरकारची तयारी नाही.

एखाद्या साथीचा इतक्या मोठ्या प्रमाणात फैलाव होतो की, कोणामुळे कोणाला संसर्ग झाला हे ओळखणेही कठीण होते. अशा अवस्थेला सामूहिक संसर्ग असे म्हणतात. संसर्गाचा मूळ स्रोत व त्याची साखळी शोधणे शक्य होत नाही. विदेशातून परतलेल्या नागरिकांमुळे भारतात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली.

विदेशातून आलेल्या व्यक्तीने कुठे कुठे प्रवास केला होता, त्याची माहिती तपासली जात होती. मात्र, आता एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर तो कोरोना रुग्णाच्या निकट संपर्कामुळे किंवा रुग्णाच्या निकट संपर्कात असलेल्या व्यक्तीमुळे तिसऱ्या व्यक्तीला झाला आहे का, याची तपासणी केली जाते. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण देशातील फक्त ४९ जिल्ह्यांमध्ये आढळून येतात. भारतात ७३३ जिल्हे आहेत. त्यामुळे सामूहिक संसर्ग अद्याप सुरू झालेला नाही हेच या आकडेवारीवरून दिसून येते, असा दावा केंद्र सरकारने नुकताच केला होता. मात्र, खासगी संस्थांमध्ये काम करणाºया विषाणूतज्ज्ञांपैकी काही जणांना हा दावा मान्य नाही.

सरकारी आकड्यांतूनच मिळतात पुरावे

देशात सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचे पुरावे सरकारी आकड्यांतूनच आढळून येतात, असेही एका विषाणूतज्ज्ञाने सांगितले. केंद्र सरकारचे कोरोना साथीविषयीचे धोरण पारदर्शक नाही. जगातील इतर देशांपेक्षा भारताची स्थिती अतिशय वाईट आहे, असे आमचे म्हणणे नाही; पण सामूहिक संसर्ग अस्तित्वातच नाही, असे केंद्र सरकारने सांगणे अतिशय चुकीचे आहे, असे एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

लसीची प्रतीक्षा संपली? ‘द लैंसेट’च्या संपादकांचे ट्विट

च्संपूर्ण जगाला ज्या लसीची प्रतीक्षा आहे त्या कोरोनावरील लसीची प्रतीक्षा संपल्याचे ट्विट ‘द लैंसेट’या वैद्यकीय नियतकालिकाचे संपादक रिचर्ड होर्टन यांनी केले आहे. या ट्विटबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. च्रिचर्ड होर्टन यांनी टष्ट्वीट केले आहे की, ‘उद्या, व्हॅक्सिन. फक्त सांगत आहे.’ या टष्ट्वीटबाबत खूपच चर्चा होत आहे. असेही सांगितले जात आहे की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून विकसित व्हॅक्सिनच्या परिणामाबाबत मोठी घोषणा आता कधीही होऊ शकते.

जगात सध्या अनेक कंपन्या व्हॅक्सिनची चाचणी करीत आहेत. चिनी कंपनी सिनोवॅक्स बायोटेक चाचणीच्या तिसºया टप्प्यात जाण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दुसºया- तिसºया टप्प्यात, तर आफ्रिका-ब्राझिलमध्ये चाचणी तिसºया टप्प्यात आहे. जर्मन कंपनी बिनोटेक फायजरसोबत व्हॅक्सिन तयार करीत आहे. भारतात दोन लसी मानव परीक्षणाच्या टप्प्यात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार