शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

CoronaVirus News: सामूहिक संसर्ग नसल्याचा केंद्राचा दावा हास्यापद; विषाणूतज्ज्ञांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 06:37 IST

कोरोनाबद्दलचे धोरण पारदर्शक नाही; सामूहिक संसर्ग नक्कीच अस्तित्वात आहे

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या ११ लाखांवर पोहोचली असतानाही देशात सामूहिक संसर्ग नसल्याचा केंद्र सरकार करीत असलेला दावा खोटा व हास्यास्पद आहे, असा आरोप काही विषाणूतज्ज्ञ व आरोग्यतज्ज्ञांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर केला आहे. देशात काही दिवसांपूर्वीच सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली असल्याचा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.

लक्षद्वीप वगळता देशाच्या प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचे रुग्ण सध्या सापडत आहेत. कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात होण्याच्या टप्प्यापर्यंत या साथीचा अद्याप फैलाव झालेला नाही, असे केंद्र सरकारचे मत आहे. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी सांगितले की, सरकारचा दावा हास्यास्पद असून सामूहिक संसर्ग नक्कीच अस्तित्वात आहे. मात्र, ही वस्तुस्थिती मान्य करण्याची सरकारची तयारी नाही.

एखाद्या साथीचा इतक्या मोठ्या प्रमाणात फैलाव होतो की, कोणामुळे कोणाला संसर्ग झाला हे ओळखणेही कठीण होते. अशा अवस्थेला सामूहिक संसर्ग असे म्हणतात. संसर्गाचा मूळ स्रोत व त्याची साखळी शोधणे शक्य होत नाही. विदेशातून परतलेल्या नागरिकांमुळे भारतात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली.

विदेशातून आलेल्या व्यक्तीने कुठे कुठे प्रवास केला होता, त्याची माहिती तपासली जात होती. मात्र, आता एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर तो कोरोना रुग्णाच्या निकट संपर्कामुळे किंवा रुग्णाच्या निकट संपर्कात असलेल्या व्यक्तीमुळे तिसऱ्या व्यक्तीला झाला आहे का, याची तपासणी केली जाते. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण देशातील फक्त ४९ जिल्ह्यांमध्ये आढळून येतात. भारतात ७३३ जिल्हे आहेत. त्यामुळे सामूहिक संसर्ग अद्याप सुरू झालेला नाही हेच या आकडेवारीवरून दिसून येते, असा दावा केंद्र सरकारने नुकताच केला होता. मात्र, खासगी संस्थांमध्ये काम करणाºया विषाणूतज्ज्ञांपैकी काही जणांना हा दावा मान्य नाही.

सरकारी आकड्यांतूनच मिळतात पुरावे

देशात सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचे पुरावे सरकारी आकड्यांतूनच आढळून येतात, असेही एका विषाणूतज्ज्ञाने सांगितले. केंद्र सरकारचे कोरोना साथीविषयीचे धोरण पारदर्शक नाही. जगातील इतर देशांपेक्षा भारताची स्थिती अतिशय वाईट आहे, असे आमचे म्हणणे नाही; पण सामूहिक संसर्ग अस्तित्वातच नाही, असे केंद्र सरकारने सांगणे अतिशय चुकीचे आहे, असे एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

लसीची प्रतीक्षा संपली? ‘द लैंसेट’च्या संपादकांचे ट्विट

च्संपूर्ण जगाला ज्या लसीची प्रतीक्षा आहे त्या कोरोनावरील लसीची प्रतीक्षा संपल्याचे ट्विट ‘द लैंसेट’या वैद्यकीय नियतकालिकाचे संपादक रिचर्ड होर्टन यांनी केले आहे. या ट्विटबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. च्रिचर्ड होर्टन यांनी टष्ट्वीट केले आहे की, ‘उद्या, व्हॅक्सिन. फक्त सांगत आहे.’ या टष्ट्वीटबाबत खूपच चर्चा होत आहे. असेही सांगितले जात आहे की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून विकसित व्हॅक्सिनच्या परिणामाबाबत मोठी घोषणा आता कधीही होऊ शकते.

जगात सध्या अनेक कंपन्या व्हॅक्सिनची चाचणी करीत आहेत. चिनी कंपनी सिनोवॅक्स बायोटेक चाचणीच्या तिसºया टप्प्यात जाण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दुसºया- तिसºया टप्प्यात, तर आफ्रिका-ब्राझिलमध्ये चाचणी तिसºया टप्प्यात आहे. जर्मन कंपनी बिनोटेक फायजरसोबत व्हॅक्सिन तयार करीत आहे. भारतात दोन लसी मानव परीक्षणाच्या टप्प्यात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार