शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

CoronaVirus News: लॉकडाऊननंतर ३० टक्केच विमानसेवा सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 03:47 IST

पहिल्या टप्प्यात फक्त ३० टक्के विमानसेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, प्रवासी व कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटकोर पालन करण्यावर भर देण्यात येईल.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेला लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त ३० टक्के विमानसेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, प्रवासी व कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटकोर पालन करण्यावर भर देण्यात येईल. त्यानुसार एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) काही मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली आहेत.पहिल्या टप्प्यात देशातील महत्त्वाच्या शहरांतून विमानसेवा पुन्हा सुरू केली जाईल. त्यामध्ये विविध राज्यांतील राजधानीची शहरे व महानगरे यांचा समावेश असेल. कोरोना साथीच्या सावटामुळे केंद्र सरकारने २२ मार्चपासून देशांतर्गत व २५ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित केली होती. देशव्यापी लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपणार असली तरी त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाऊन कधी मागे घेतला जाईल व विमानसेवा पुन्हा कधी सुरू होते याकडे असंख्य लोकांचे लक्ष लागलेले आहे. एएआयने मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे की, एखाद्या विमानतळावर अनेक टर्मिनल असतील तर सध्याच्या काळात फक्त एकाच टर्मिनलचा वापर करणे योग्य ठरेल. विमानतळावर सामान वाहून नेणारे अनेक स्वयंचलित पट्टे असतील तर त्यांच्यापैकी काहींचाच आळीपाळीने वापर व्हावा. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्यास मदत होईल.लॉकडाऊन हटविल्यानंतर विमानसेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास काही काळ जावा लागेल. तोपर्यंत प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन विमानतळावरील स्टॉलवर मर्यादित प्रमाणातच खाद्यपदार्थ ठेवावेत. सार्वजनिक वाहतूक सेवा, खासगी वाहतूक सेवा नीट सुरू असल्यास प्रवासी, कर्मचाऱ्यांना विमानतळावर पोहोचणे सुलभ होईल. त्याची विमानतळ प्रशासनाने वेळोवेळी खात्री करून घ्यावी.>खासगी कंपन्याही घेणार काळजीदेशभरातील १०० विमानतळांच्या देखभालीची व्यवस्था एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे आहे. मात्र दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद या शहरांतील विमानतळांची व्यवस्था खाजगी कंपन्यांकडे आहे. दिल्ली व मुंबई विमानतळाची देखभाल करणाºया अनुक्रमे जीएमआर ग्रुुपची डीआयएएल कंपनी व जीव्हीके ग्रुपच्या एमआयएएल कंपनीने म्हटले आहे की, विमानतळावर रांगेमध्ये दोन प्रवाशांमध्ये दीड मीटरचे अंतर ठेवले जाईल. विमानतळावर तात्पुरते क्वारंटाइन केंद्र उभारण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या