शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus News: लॉकडाऊननंतर ३० टक्केच विमानसेवा सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 03:47 IST

पहिल्या टप्प्यात फक्त ३० टक्के विमानसेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, प्रवासी व कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटकोर पालन करण्यावर भर देण्यात येईल.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेला लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त ३० टक्के विमानसेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, प्रवासी व कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटकोर पालन करण्यावर भर देण्यात येईल. त्यानुसार एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) काही मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली आहेत.पहिल्या टप्प्यात देशातील महत्त्वाच्या शहरांतून विमानसेवा पुन्हा सुरू केली जाईल. त्यामध्ये विविध राज्यांतील राजधानीची शहरे व महानगरे यांचा समावेश असेल. कोरोना साथीच्या सावटामुळे केंद्र सरकारने २२ मार्चपासून देशांतर्गत व २५ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित केली होती. देशव्यापी लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपणार असली तरी त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाऊन कधी मागे घेतला जाईल व विमानसेवा पुन्हा कधी सुरू होते याकडे असंख्य लोकांचे लक्ष लागलेले आहे. एएआयने मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे की, एखाद्या विमानतळावर अनेक टर्मिनल असतील तर सध्याच्या काळात फक्त एकाच टर्मिनलचा वापर करणे योग्य ठरेल. विमानतळावर सामान वाहून नेणारे अनेक स्वयंचलित पट्टे असतील तर त्यांच्यापैकी काहींचाच आळीपाळीने वापर व्हावा. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्यास मदत होईल.लॉकडाऊन हटविल्यानंतर विमानसेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास काही काळ जावा लागेल. तोपर्यंत प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन विमानतळावरील स्टॉलवर मर्यादित प्रमाणातच खाद्यपदार्थ ठेवावेत. सार्वजनिक वाहतूक सेवा, खासगी वाहतूक सेवा नीट सुरू असल्यास प्रवासी, कर्मचाऱ्यांना विमानतळावर पोहोचणे सुलभ होईल. त्याची विमानतळ प्रशासनाने वेळोवेळी खात्री करून घ्यावी.>खासगी कंपन्याही घेणार काळजीदेशभरातील १०० विमानतळांच्या देखभालीची व्यवस्था एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे आहे. मात्र दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद या शहरांतील विमानतळांची व्यवस्था खाजगी कंपन्यांकडे आहे. दिल्ली व मुंबई विमानतळाची देखभाल करणाºया अनुक्रमे जीएमआर ग्रुुपची डीआयएएल कंपनी व जीव्हीके ग्रुपच्या एमआयएएल कंपनीने म्हटले आहे की, विमानतळावर रांगेमध्ये दोन प्रवाशांमध्ये दीड मीटरचे अंतर ठेवले जाईल. विमानतळावर तात्पुरते क्वारंटाइन केंद्र उभारण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या