शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

CoronaVirus News : भारतात झाल्या कोरोनाच्या ७५ लाख चाचण्या, महाराष्ट्र, दिल्लीनंतर तेलंगणाचा नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:58 IST

भारतात तीन प्रकारच्या कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्याही १,००० वर गेलेली आहे. यात ७३० सरकारी व २३० खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : एका दिवसात विक्रमी दोन लाखांवर कोरोना चाचण्या भारताने केल्या आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत भारताने एका दिवसात तब्बल २.१५ लाख चाचण्या केल्या आहेत. याबरोबरच भारताने आजवर केलेल्या चाचण्यांची संख्या जी ७३.५२ लाख होती ती बुधवारी रात्रीपर्यंत ७५ लाखांच्या पुढे गेलेली असेल. भारतात तीन प्रकारच्या कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्याही १,००० वर गेलेली आहे. यात ७३० सरकारी व २३० खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.तथापि, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, आता ती ४.५६ लाखांवर गेली आहे. १ जून २०२० रोजी भारतातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १.९० लाख होती; परंतु ती केवळ २४ दिवसांत दुप्पट झाली आहे. या कालावधीत चाचण्यांमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाणही ४.९६ टक्क्यांवरून वाढले असून, ते ६.२ टक्के झाले आहे.पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण महाराष्टÑ, दिल्लीनंतर तेलंगणामध्ये सर्वांत जास्त आहे. विशेष म्हणजे तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ९.४४ लाख चाचण्या झाल्या असल्या तरी महाराष्टÑ (१७.७ टक्के) व दिल्लीमध्ये (१६.६ टक्के) रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्तआहे.१५ जून रोजी महाराष्टÑात ६.५९ लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५.९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. याचप्रमाणे १० दिवसांच्या आत हा दर २ टक्क्यांनी वाढला. त्याचप्रमाणे १५ जून रोजी दिल्लीतील पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण १४.२ टक्के होते; परंतु ते २.४ टक्क्यांनी वाढले. हे सर्वाधिक होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या