शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

CoronaVirus News: अनलॉकच्या आधी ७० टक्के ज्येष्ठांचे लसीकरण हवे -भार्गव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:14 IST

CoronaVirus News: भार्गव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांशिवाय ४५ वयाच्या पुढील व गंभीर आजारी असलेल्या किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यानंतरच अनलॉक केले जावे.

नवी दिल्ली : राज्यांनी ६० पेक्षा जास्त वयाच्या कमीत कमी ७० टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करूनच अनलॉक करावे, असा सल्ला आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिला. भार्गव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांशिवाय ४५ वयाच्या पुढील व गंभीर आजारी असलेल्या किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यानंतरच अनलॉक केले जावे. अनलॉकनंतर कोरोना संक्रमणात थोड़ी वाढ होऊ शकते अशी शंका व्यक्त करून भार्गव म्हणाले, आरोग्य सेवांना सध्याच्या अवस्थेत अनलॉकमध्येही कायम ठेवले जावे. अनलॉक अशा ठिकाणी केले जावे जेथे संक्रमणाचा दर सलग सात दिवस पाच टक्क्यांच्या कमी असेल. अनलॉकमध्येही मास्क आणि सामाजिक अंतर नियमांचे पालन झाले पाहिजे. लसीबद्दल गावागावांत होत असलेल्या चुकीच्या प्रचारावर डॉ. भार्गव म्हणाले, आधी शहरांत अशा अफवा होत्या. तेथे आता लोक लस घेण्यासाठी पळापळ करीत आहेत. एली लिलीच्या औषधास मंजुरी अमेरिकेतील औषधी कंपनी एली लिली यांना कोरोनावरील उपचारासाठी भारतात औषधांच्या आपत्कालीन उपचारास परवानगी मिळाली आहे. बामलानिविमॅब ७०० मि.ग्रॅ. आणि एटेसेविमॅब १४०० मि.ग्रॅ. या औषधांच्या एकीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. या कंपनीचे भारतासाठीचे कार्यकारी संचालक लुका विसीनी यांनी सांगितले की, भारतातील आरोग्य सुविधांसाठी आणि उपचारांसाठी आमच्याकडे एक पर्याय आहे. हे औषध १२ वर्षांवरील, ४० किलोपेक्षा अधिक वजन असलेल्यांना दिले जाते. या औषधाचा उपयोग केवळ आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर केला जातो. याशिवाय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या गंभीर रुग्णांनाही हे इंजेक्शन दिले जाईल. मात्र, जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांना हे औषध दिले जाणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस