शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

CoronaVirus News : चीनमध्ये ८४ हजार नव्हे, ६ लाख ४० हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 07:16 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, हे ६ लाख ४० हजार बाधित २३० शहरांमध्ये पसरलेले आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल या कालखंडातील आढळलेल्या प्रत्येक रुग्णाच्या प्रत्यक्ष ठिकाणाची माहिती विद्यापीठाकडे आहे.

नवी दिल्ली : चीनमधील एका लष्करी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील कोरोनाबाधित आणि बळींचा आकडा सांगितल्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. चांगशा सिटीतील राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मते चीनमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८४ हजार नसून ६ लाख ४० हजार इतका आहे. चीनकडून सांगितल्या जात असलेल्या संख्येबाबत जागतिक समुदायाकडून आधीपासूनच संशय व्यक्त केला जात आहे. याला तेथील सत्ताधाऱ्यांचे लपवाछपवीचे धोरण कारणीभूत आहे.विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, हे ६ लाख ४० हजार बाधित २३० शहरांमध्ये पसरलेले आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल या कालखंडातील आढळलेल्या प्रत्येक रुग्णाच्या प्रत्यक्ष ठिकाणाची माहिती विद्यापीठाकडे आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची आकडेवारीही त्यात आहे.चीनमध्ये संसर्गाचे मुख्य केंद्र ठरलेल्या वुहान प्रांताची खरी आकडेवारी जगासमोर मांडलेलीच नाही, असाही आरोप चीनवर होत आला आहे; परंतु चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी पत्रक काढून चुकीची आकडेवारी सांगितल्याच्या बाबीचे खंडन केलेहोते.अमेरिकेपेक्षा चीन पुढेमागील महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला होता की, कोरोनाबाधित आणि बळींच्या बाबतीत चीन अमेरिकेच्या खूप पुढे आहे. हा चीनचा आकडा जगात सर्वाधिक आहे.चीनच्या मते संख्येबाबत भारताची चीनवर मात;रुग्णसंख्या ८५ हजारांच्या वर; मृत्यूदर कमी- कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत भारताने शनिवारी चीनवर मात केली आहे. चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या ८४ हजारांपेक्षा अधिक आहे. भारतात आता कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारांच्या वर पोहोचली आहे. मात्र, भारतातील मृत्यूदर चीनपेक्षा कमी आहे.- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. देशामध्ये शुक्रवारी या आजाराचे ३,७८७ नवे रुग्ण आढळून आले तसेच आणखी १०५ जणांचा मृत्यू झाला होता. सध्या देशात ५३,५४८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर उपचारांंनंतर पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ३४,२२४ इतकी आहे.लॉकडाउनच्या काळात लागू केलेले निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केल्यानंतरच्या दुसºया दिवशी, म्हणजे ३ मेपासून कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यास सुरुवात झाली.या तारखेला ४० हजार असलेली रुग्णांची संख्या त्यानंतर काही दिवसांतच ९० हजारांच्या वर जाऊन पोहोचली आहे. या आजारापायी चीनमध्ये ५.३ टक्के इतका मृत्यूदर होता. मात्र, भारतामध्ये हे प्रमाण कमी म्हणजे ३.५ टक्केच आहे, ही एक चांगली बाब आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन