शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

CoronaVirus News : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४०%; मृत्युदर लाखामागे ०.२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 06:10 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : भारतात लाखापेक्षाही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे ७.१ टक्के होते.

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : सलग चौथ्या लॉकडाऊनचा अत्यंत चांगला परिणाम दिसत असून, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता जवळपास ४० टक्क्यांवर पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत आरोग्य यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

भारतात लाखापेक्षाही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे ७.१ टक्के होते. चौथ्या लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण तब्बल पाचपट करण्यात भारताला यश आले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ११.४२ टक्क्यांवरून तिसºया टप्प्यात दुपटीपेक्षा जास्त २६.५९ टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले होते.जगातील १५ देशांची एकत्रित लोकसंख्या भारताइतकी असून, तिथे ३६ लाख ४५ हजार रुग्ण आहेत. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने मात्र वेळीच उपाययोजना करून कोरोना प्रसार मर्यादित करण्यात यश मिळवले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असे वाढवलेलॉकडाऊनमध्ये अर्थव्यवहारावर निर्बंध आणताना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांची पूर्तता देशात करण्यात आली. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी तीन श्रेणीत रुग्णालयांची विभागणी करण्यात आली. रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत असताना रुग्णांना होम क्वारंटाईन, दहा दिवसांनी घरी जाण्याची मुभाही दिली. जीवनशैलीतील बदलांमुळेही प्रतिकारशक्ती वाढली. उपचार सुरू असलेल्या ६१ हजार १४९ पैकी २.९४ टक्के रुग्णांना आॅक्सिजनपुरवठा केला जात आहे, तर ३ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, ६.४५ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपताना हे प्रमाण सरासरी ७० टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत २५ लाख ३६ हजार १५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. बुधवारी दुपारपर्यंत १ लाख ७ हजार ६०४ नमुने तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे वरिष्ठ संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.रुग्णसंख्येत दहा देशांच्या यादीत असूनही भारतात मृत्यूदर सर्वांत कमी आहे. स्पेनमध्ये सर्वाधिक २७.७ टक्के रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत झाला. एक लाखामागे तेथे ५९ जणांचा मृत्यू झाला. भारतात हे प्रमाण एक लाख रुग्णांमागे ०.२ टक्का आहे. लोकसंख्येच्या बाबतीत तुल्यबळ असलेल्या चीनच्या दाव्यानुसार हे प्रमाण ०.३ टक्का आहे. अमेरिकेत दर लाखामागे ४५२, तर स्पेनमध्ये ४९६ जणांना कोरोना होतो. इटलीमध्ये ३७४, ब्रिटनमध्ये ३७१, जर्मनीमध्ये २११, फ्रान्समध्ये २१०, रशियात २०८, तुर्कीमध्ये १८३, इराणमध्ये १५०, ब्राझीलमध्ये ११५ संक्रमित आहेत. जगात हीच सरासरी ६२ आहे, तर भारतात एक लाख लोकांमागे ७.९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.0.3% आयसीयूतदेशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या61149 सध्या बाधित6147 रुग्ण10%हा आकडा आहे.43070ठणठणीत बरे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत