शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus Lockdown News: 'त्या' १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली; महाराष्ट्रातील किती जिल्हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 08:58 IST

CoronaVirus Lockdown News: देशातील १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन गरजेचा; आरोग्य मंत्रालयाचा केंद्राला प्रस्ताव

नवी दिल्ली: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला. गेल्या ६ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लागू होणार का याबद्दल चर्चा सुरू झाली. मात्र देशव्यापी लॉकडाऊन लागण्याची शक्यता कमी असून जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याची तयारी केंद्रानं सुरू केली आहे.राज्यात कडक निर्बंध 10 दिवस वाढणार?; आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयगेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली असताना देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. याचा थेट फटका अर्थव्यवस्थेला बसला. त्यामुळे आता जिल्हा स्तरावर लॉकडाऊन लागू करण्याचा विचार केंद्राकडून सुरू आहे. त्यानुसार आरोग्य मंत्रालयानं एक प्रस्ताव तयार केला आहे. कोरोना संक्रमणाचा दर १५ टक्के असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याची शिफारस मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या जातील.राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम; निर्बंध कायम ठेवावे लागतील, कोरोना टास्क फोर्सचे मतकोरोना संक्रमणाचा दर १५ टक्के असलेल्या जिल्ह्यांची संख्या १५० इतकी असू शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. केंद्र सरकार राज्य सरकारांशी चर्चा करून याबद्दलचा अंतिम निर्णय घेईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरच या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच विदर्भ, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे या भागातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावात असू शकतो.आरोग्य मंत्रालयाकडून केंद्राला एक प्रस्ताव देण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर १५ टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन गरजेचा असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावला लागले. अन्यथा इथल्या आरोग्य सुविधांवर खूप मोठा ताण येईल, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही आठवड्यांचा लॉकडाऊन केल्यास कोरोनाची साखळी तोडता येईल, असं आरोग्य मंत्रालयानं प्रस्तावात म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या