शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus New Guidelines: परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना दिलासा; कोरोनाबाबत केंद्राची नवी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 14:34 IST

कोरोनाच्या परिस्थितीत सुधार आल्यानं केंद्रीय मंत्रालयानं परदेशातून येणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं नवी नियमावली तयार केली आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत आदेश काढला. यात परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना नव्या नियमावलीमुळे दिलासा मिळणार आहे. मंत्रालयानं जोखीम असलेल्या देशांची श्रेणी रद्द केली आहे. त्याशिवाय ७ दिवसांच्या सक्तीच्या होम क्वारंटाइनमधूनही प्रवाशांना सूट देण्यात आली आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत सुधार आल्यानं केंद्रीय मंत्रालयानं परदेशातून येणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. नवी नियमावली १४ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार, आता जोखीम श्रेणीतील देश आणि अन्य देश यात कुठलाही फरक नसणार आहे. त्यासोबतच आरोग्य मंत्रालयानं परदेशातून भारतात येणाऱ्यांसाठी ७ दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्येही बदल केला आहे. या प्रवाशांना १४ दिवस स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

भारतात येण्यापूर्वी पोर्टलवर द्यावी लागेल माहिती

नव्या नियमावलीनुसार, जो कुणाला भारतात यायचं असेल त्यांनी आधी सुविधा पोर्टलवर एक माहिती पत्रिका भरुन द्यायची आहे. त्यात मागील १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यायची आहे. खालील दिलेल्या पोर्टलवर क्लिक करुन (https://www.newdelhiairport.in/airsuvidha/apho-registration) तुम्ही माहिती भरु शकता.

नव्या नियमावलीतील प्रमुख अटी

परदेशातून येणाऱ्यांसाठी ७२ तासांपूर्वी आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह अथवा पूर्ण लसीकरण झालेले प्रमाणपत्र एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावं लागेल

संबंधित एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल एजन्सीने प्रवाशांना तिकीट देण्यापूर्वी देशातील कोरोना प्रोटोकॉल माहिती आणि संबंधित नियमांबाबत माहिती द्यावी.

विमानात केवळ याच प्रवाशांना प्रवास करुन द्यावा जे एसिम्टोमॅटिक असतील. त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू एप डाऊनलोड करावा लागेल

उड्डाणावेळी विमानात होणाऱ्या उद्घोषणेत कोविड १९ पासून सावध राहणाऱ्या सूचनांची माहिती द्यावी लागेल.

विमान पायलट आणि क्रू मेंबर्स कोविड नियमांचे पालन करतील. जर कुठल्याही प्रवाशाला कोविड लक्षणं आढळली तर त्याबाबत योग्य ती तक्रार करुन प्रोटोकॉलनुसार संबंधित प्रवाशाला आयसोलेट करावं लागेल.

देशात कोरोनाची स्थिती

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ६७ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या