शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: दिलासादायक! देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, दिवसभरात सापडले एवढे रुग्ण

By बाळकृष्ण परब | Updated: November 16, 2020 10:50 IST

CoronaVirus Positive News : गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशभरात सापडले कोरोनाचे ३० हजार ५४८ नवे रुग्ण देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली ८८ लाख ४५ हजार १२७ वर दिवसभरात देशात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ०७० एवढी झाली

नवी दिल्ली - दिवाळीमुळे वाढलेली गर्दी, प्रदूषण, राजधानी दिल्लीमध्ये वाढत असलेली कोरोनाच्या रुग्णांची संख्या, देशात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची तज्ज्ञांकडून व्यक्त होत असलेली भीती, या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत कोरोनाविरोधात देशासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट दिसून आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ३० हजार ५४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मादितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३० हजार ५४८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ८८ लाख ४५ हजार १२७ वर पोहोचली आहे. तर गेल्या दिवसभरात देशात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ०७० एवढी झाली आहे. 

तसेच गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४३ हजार ८५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा हा ८२ लाख ४९ हजार ५७९ वर पोहोचला आहे. तर सध्याच्या घडीला देशात कोरोनाचे ४ लाख ६५ हजार ४७८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत असल्याने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.दरम्यान, कोरोना व्हायरसने गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भारतासह संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसची लस कधी तयार होणार याकडे संपूर्ण जगभरातील लोकांचे लक्ष आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाच्या संक्रमणाबाबत तसंच लसीकरणाबाबत एक  सकारात्मक माहिती समोर येत आहे.  कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या पाहून एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी  देशात कोरोनाची लस येण्याआधीच भारतीयांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी इम्युनिटी तयार होईल असा दावा केला आहे.दिल्लीप्रमाणेच भारतातील इतर राज्यात वाढत जाणारं प्रदूषण, दिवाळीची एकूण परिस्थिती पाहता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.  याशिवाय थंडीमुळे पुन्हा एकदा  कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढू शकतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं असतानाच एम्सच्या डॉक्टरांनी केलेला दावा हा दिलासादायक ठरत आहे. कोरोनाबाबत माहिती देताना डॉ. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया  यांनी सांगितले  की, ''आपण ज्या प्रकारचा ट्रेंड पाहत आहोत. ते पाहिल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की देशात कोरोनाची लस येण्याआधी भारतीयांची प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. कोरोनाचे स्वरुप कदाचित बदलणार नाही.''

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यIndiaभारत