शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: दिलासादायक! देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, दिवसभरात सापडले एवढे रुग्ण

By बाळकृष्ण परब | Updated: November 16, 2020 10:50 IST

CoronaVirus Positive News : गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशभरात सापडले कोरोनाचे ३० हजार ५४८ नवे रुग्ण देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली ८८ लाख ४५ हजार १२७ वर दिवसभरात देशात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ०७० एवढी झाली

नवी दिल्ली - दिवाळीमुळे वाढलेली गर्दी, प्रदूषण, राजधानी दिल्लीमध्ये वाढत असलेली कोरोनाच्या रुग्णांची संख्या, देशात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची तज्ज्ञांकडून व्यक्त होत असलेली भीती, या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत कोरोनाविरोधात देशासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट दिसून आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ३० हजार ५४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मादितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३० हजार ५४८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ८८ लाख ४५ हजार १२७ वर पोहोचली आहे. तर गेल्या दिवसभरात देशात ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ०७० एवढी झाली आहे. 

तसेच गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४३ हजार ८५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा हा ८२ लाख ४९ हजार ५७९ वर पोहोचला आहे. तर सध्याच्या घडीला देशात कोरोनाचे ४ लाख ६५ हजार ४७८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत असल्याने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.दरम्यान, कोरोना व्हायरसने गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भारतासह संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसची लस कधी तयार होणार याकडे संपूर्ण जगभरातील लोकांचे लक्ष आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाच्या संक्रमणाबाबत तसंच लसीकरणाबाबत एक  सकारात्मक माहिती समोर येत आहे.  कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या पाहून एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी  देशात कोरोनाची लस येण्याआधीच भारतीयांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी इम्युनिटी तयार होईल असा दावा केला आहे.दिल्लीप्रमाणेच भारतातील इतर राज्यात वाढत जाणारं प्रदूषण, दिवाळीची एकूण परिस्थिती पाहता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.  याशिवाय थंडीमुळे पुन्हा एकदा  कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढू शकतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं असतानाच एम्सच्या डॉक्टरांनी केलेला दावा हा दिलासादायक ठरत आहे. कोरोनाबाबत माहिती देताना डॉ. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया  यांनी सांगितले  की, ''आपण ज्या प्रकारचा ट्रेंड पाहत आहोत. ते पाहिल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की देशात कोरोनाची लस येण्याआधी भारतीयांची प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. कोरोनाचे स्वरुप कदाचित बदलणार नाही.''

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यIndiaभारत