शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

CoronaVirus: जम्मू-काश्मिरातील कुटुंबाने दाखवली माणुसकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:47 IST

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या पुण्यातल्या तिघांना काश्मीरमधील कुटुंबाकडून गेल्या ३२ दिवसांपासून आश्रय

पुणे : कोरोनाच्या संकटाच्या काळात जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भादरवा भागातील कुटुंबाने माणुसकीचे दर्शन घडवले. माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी जम्मू काश्मीरला गेलेले पुण्यातील तिघे जण अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे भादरवा व्हॅलीमध्ये अडकून पडले. तेथील स्थानिक कुटुंबाने त्यांना गेल्या ३२ दिवसांपासून आश्रय दिला असून, आपल्याच कुटुंबाचा भाग करून घेतले आहे. हा अनुभव पुण्यातील प्रवाशांना ‘काश्मिरियत’ची झलक दाखवणारा ठरला.नचिकेत गुत्तीकर, शमीन कुलकर्णी आणि निनाद दातार एका माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी १५ मार्च रोजी जम्मू काश्मीरला गेले होते. काम संपवून २५ मे रोजी पुण्यात परतण्याच्या तयारीत असतानाच कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाला आणि ते सर्व जण अडकून पडले. मात्र, केंद्र सरकारकडून सर्व विमानसेवा बंद झाल्याची घोषणा करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील हॉटेल आणि वाहतूक सेवाही बंद झाली. अचानक उद्भवलेल्या संकटामुळे अनोळखी प्रदेशात काय करावे, असा सर्वांनाच प्रश्न पडला. अशा वेळी स्थानिक लोक त्यांच्या मदतीला धावून आले. गाथा या गावातील एका कुटुंबाने त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी दिली. दोन दिवस त्या कुटुंबासमवेत राहिल्यानंतर पुण्यातील प्रवाशांचे तेथील दवाखान्यात विलगीकरण करण्यात आले. स्थानिक कुटुंबातील आझीम नावाचा मुलगाही १४ दिवस त्यांच्यासमवेत विलगीकरणात राहिला. यातून प्रवाशांना खरी ‘काश्मिरियत’ अनुभवायला मिळाली.‘गेल्या ३२ दिवसांपासून आम्ही काश्मीरमधील कुटुंबाबरोबर राहत आहोत. मात्र, एकही क्षण त्यांनी आम्हाला एकटेपणाची जाणीव होऊ दिलेली नाही. भारताच्या इतर भागांमध्ये माणुसकीची झलक पाहायला मिळाली नसती.’, अशी भावना नचिकेत गुत्तीकर यांनी व्यक्त केली.सध्या परिस्थिती खडतर असल्याने येथून निघणे शक्य नाही. आमच्यासारखे अनेक लोक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. मात्र, येथील कुटुंबाने आम्हाला त्यांच्यात सामावून घेतले आहे. घरच्या लोकांची खूप आठवण येते, पण परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. केंद्र सरकारकडून सर्व घोषणा अचानक होतात, त्यामुळे तयारीलाही वेळ मिळत नाही. परिस्थितीबाबत काही अंदाज आला तर त्याप्रमाणे पावले उचलता येतात. जम्मू काश्मीरसारखा आपुलकीचा अनुभव इतरत्र आला नसता.- नचिकेत गुत्तीकर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या