शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

CoronaVirus: जम्मू-काश्मिरातील कुटुंबाने दाखवली माणुसकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:47 IST

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या पुण्यातल्या तिघांना काश्मीरमधील कुटुंबाकडून गेल्या ३२ दिवसांपासून आश्रय

पुणे : कोरोनाच्या संकटाच्या काळात जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भादरवा भागातील कुटुंबाने माणुसकीचे दर्शन घडवले. माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी जम्मू काश्मीरला गेलेले पुण्यातील तिघे जण अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे भादरवा व्हॅलीमध्ये अडकून पडले. तेथील स्थानिक कुटुंबाने त्यांना गेल्या ३२ दिवसांपासून आश्रय दिला असून, आपल्याच कुटुंबाचा भाग करून घेतले आहे. हा अनुभव पुण्यातील प्रवाशांना ‘काश्मिरियत’ची झलक दाखवणारा ठरला.नचिकेत गुत्तीकर, शमीन कुलकर्णी आणि निनाद दातार एका माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी १५ मार्च रोजी जम्मू काश्मीरला गेले होते. काम संपवून २५ मे रोजी पुण्यात परतण्याच्या तयारीत असतानाच कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाला आणि ते सर्व जण अडकून पडले. मात्र, केंद्र सरकारकडून सर्व विमानसेवा बंद झाल्याची घोषणा करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील हॉटेल आणि वाहतूक सेवाही बंद झाली. अचानक उद्भवलेल्या संकटामुळे अनोळखी प्रदेशात काय करावे, असा सर्वांनाच प्रश्न पडला. अशा वेळी स्थानिक लोक त्यांच्या मदतीला धावून आले. गाथा या गावातील एका कुटुंबाने त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी दिली. दोन दिवस त्या कुटुंबासमवेत राहिल्यानंतर पुण्यातील प्रवाशांचे तेथील दवाखान्यात विलगीकरण करण्यात आले. स्थानिक कुटुंबातील आझीम नावाचा मुलगाही १४ दिवस त्यांच्यासमवेत विलगीकरणात राहिला. यातून प्रवाशांना खरी ‘काश्मिरियत’ अनुभवायला मिळाली.‘गेल्या ३२ दिवसांपासून आम्ही काश्मीरमधील कुटुंबाबरोबर राहत आहोत. मात्र, एकही क्षण त्यांनी आम्हाला एकटेपणाची जाणीव होऊ दिलेली नाही. भारताच्या इतर भागांमध्ये माणुसकीची झलक पाहायला मिळाली नसती.’, अशी भावना नचिकेत गुत्तीकर यांनी व्यक्त केली.सध्या परिस्थिती खडतर असल्याने येथून निघणे शक्य नाही. आमच्यासारखे अनेक लोक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. मात्र, येथील कुटुंबाने आम्हाला त्यांच्यात सामावून घेतले आहे. घरच्या लोकांची खूप आठवण येते, पण परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. केंद्र सरकारकडून सर्व घोषणा अचानक होतात, त्यामुळे तयारीलाही वेळ मिळत नाही. परिस्थितीबाबत काही अंदाज आला तर त्याप्रमाणे पावले उचलता येतात. जम्मू काश्मीरसारखा आपुलकीचा अनुभव इतरत्र आला नसता.- नचिकेत गुत्तीकर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या