शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

coronavirus: भयावह; २४ तासांत सापडले ८९ हजार रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ४३ लाखांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 10:42 IST

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल ८९ हजार ७०६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकू कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाख ७० हजार १२९ झाला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव दिवसेंदिवस देशात गंभीर परिस्थिती निर्माण करत आहे. त्यातच गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाच्या आकडेवारीने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल ८९ हजारांहून अधिक रुग्ण सापडले असून, दिवसभरात १११५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल ८९ हजार ७०६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकू कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाख ७० हजार १२९ झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३३ लाख ९८ हजार ८४५ हजार हून अधिक झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात देशात तब्बल १ हजार ५३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७३ हजार ८९० एवढी झाली आहे. 

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाचे २० हजार रुग्णमहाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे २० हजार १३१ रुग्ण आढळले असून ३८० मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांचा आलेख चढाच आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ४३ हजार ७७२ झाली असून मृतांचा आकडा २७,४०७ झाला.राज्यात सध्या २ लाख ४३ हजार ४४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.२६ असून मृत्युदर २.९ टक्के आहे. दिवसभरात १३,२३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.दिल्लीमध्ये पुन्हा परिस्थिती बिघडलीकाही दिवसांपूर्वीपर्यंत कोरोना नियंत्रणात आलेल्या दिल्लीमध्ये पुन्हा एकदा बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दिल्लीत काल ३ हजार ६०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. उत्तर प्रदेशमध्येही काल ६ हजार ७४३ रुग्णांची नोंद झाली आहे.दक्षिण भारतातही कोरोना मोकाटकोरोना विषाणूने देशातील इतर भागांप्रमाणेच दक्षिण भारतालाही घट्ट विळखा घातला आहे. दक्षिण भारतात आंध्र प्रदेशात सर्वाधिक बिकट परिस्थिती असून, राज्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तर मंगळवारी सापडलेल्या १० हजार ६०१ रुग्णांसह येथील रुग्णसंख्या पाच लाख १७ हजार झाली आहे. तामिळनाडूमध्ये पाच हजार, केरळमध्ये तीन हजार आणि तेलंगणामध्ये दोन हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत