शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

coronavirus: भयावह; २४ तासांत सापडले ८९ हजार रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ४३ लाखांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 10:42 IST

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल ८९ हजार ७०६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकू कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाख ७० हजार १२९ झाला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव दिवसेंदिवस देशात गंभीर परिस्थिती निर्माण करत आहे. त्यातच गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाच्या आकडेवारीने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल ८९ हजारांहून अधिक रुग्ण सापडले असून, दिवसभरात १११५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल ८९ हजार ७०६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकू कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाख ७० हजार १२९ झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३३ लाख ९८ हजार ८४५ हजार हून अधिक झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात देशात तब्बल १ हजार ५३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७३ हजार ८९० एवढी झाली आहे. 

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाचे २० हजार रुग्णमहाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे २० हजार १३१ रुग्ण आढळले असून ३८० मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांचा आलेख चढाच आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ४३ हजार ७७२ झाली असून मृतांचा आकडा २७,४०७ झाला.राज्यात सध्या २ लाख ४३ हजार ४४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.२६ असून मृत्युदर २.९ टक्के आहे. दिवसभरात १३,२३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.दिल्लीमध्ये पुन्हा परिस्थिती बिघडलीकाही दिवसांपूर्वीपर्यंत कोरोना नियंत्रणात आलेल्या दिल्लीमध्ये पुन्हा एकदा बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दिल्लीत काल ३ हजार ६०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. उत्तर प्रदेशमध्येही काल ६ हजार ७४३ रुग्णांची नोंद झाली आहे.दक्षिण भारतातही कोरोना मोकाटकोरोना विषाणूने देशातील इतर भागांप्रमाणेच दक्षिण भारतालाही घट्ट विळखा घातला आहे. दक्षिण भारतात आंध्र प्रदेशात सर्वाधिक बिकट परिस्थिती असून, राज्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तर मंगळवारी सापडलेल्या १० हजार ६०१ रुग्णांसह येथील रुग्णसंख्या पाच लाख १७ हजार झाली आहे. तामिळनाडूमध्ये पाच हजार, केरळमध्ये तीन हजार आणि तेलंगणामध्ये दोन हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत