शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: 'मोदींच्या वाराणसीत विदारक स्थिती, लॉकडाऊनमुळे गवत खाण्याची उद्भवली परिस्थिती'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 16:31 IST

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पॅकेज जाहीर केले

वाराणसी - कोरोनामुळे देशाच्या विकासाची चाके थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी आज दुपारी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. मात्र, लॉकडाऊनमुळे गरीब अन् हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची भुकमारी होत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणस मतदारसंघातच नागरिकांनी चक्क गवत खाऊन दिवस काढल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पॅकेज जाहीर केले. मात्र, लॉकडाऊननंतरची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. वाराणसीतील मुसहर समाजाला आता कोरोनामुळे त्रस्त व्हावं लागत आहे. वाराणसी येथील कोईरीपुर मुसहर वस्तीत लॉक डाऊनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या ३ दिवसांपासून येथील घरात चूल पेटली नाही. आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी येथील लोकं चक्क गवत खात आहेत. या समाजातील लोकांकडे मास्क आणि सॅनिटायझर्स सोडा, पण हात धुवायला साबणही नाही. हीच परिस्थिती पिंडरा येथील वस्त्यांवरही दिसून येतेय. घरात रेशन आणि अन्न धान्य नसल्याने येथील नागरिकांच्या घरात चूलच पेटत नाही. 

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या संदर्भातील बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. तसेच, आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणीही केली. विशेष म्हणजे थरुर यांच्या मागणीनंतर काही तासातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. थरुर यांनी वारणसीतील विदारक परिस्थिती मांडत, मोदी सरकारवर टीका केली. सोचा नही था इतने अच्छे दिन आयेंगे, वाराणसी के लोग भी घास खायेंगे, असे ट्विट थरुर यांनी केले आहे. 

दरम्यान, कोरोनाला केवळ करुणेनेच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. आपण या संकटप्रसंगी गरिबांच्या प्रती करुणा दाखवू शकतो. आता नवरात्र सुरू आहे. या निमित्ताने आपण पुढील 21 दिवस 9 गरीब कुटुंबाचे पालन करण्याची जबाबदारी घेतली, तर नवरात्र यशस्वी होईल, असे मोदींनी वाराणसी येथील नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधताना म्हटले. या शिवाय आपल्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांचीही काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज जनतेला केले. संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसबरोबरच्या लढाल्या सुरुवात केल्यानंतर, त्यांनी बुधवारी वाराणसीतील जनतेशी संवाद साधला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूfoodअन्न