शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

coronavirus: 'मोदींच्या वाराणसीत विदारक स्थिती, लॉकडाऊनमुळे गवत खाण्याची उद्भवली परिस्थिती'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 16:31 IST

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पॅकेज जाहीर केले

वाराणसी - कोरोनामुळे देशाच्या विकासाची चाके थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी आज दुपारी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. मात्र, लॉकडाऊनमुळे गरीब अन् हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची भुकमारी होत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणस मतदारसंघातच नागरिकांनी चक्क गवत खाऊन दिवस काढल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पॅकेज जाहीर केले. मात्र, लॉकडाऊननंतरची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. वाराणसीतील मुसहर समाजाला आता कोरोनामुळे त्रस्त व्हावं लागत आहे. वाराणसी येथील कोईरीपुर मुसहर वस्तीत लॉक डाऊनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या ३ दिवसांपासून येथील घरात चूल पेटली नाही. आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी येथील लोकं चक्क गवत खात आहेत. या समाजातील लोकांकडे मास्क आणि सॅनिटायझर्स सोडा, पण हात धुवायला साबणही नाही. हीच परिस्थिती पिंडरा येथील वस्त्यांवरही दिसून येतेय. घरात रेशन आणि अन्न धान्य नसल्याने येथील नागरिकांच्या घरात चूलच पेटत नाही. 

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या संदर्भातील बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. तसेच, आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणीही केली. विशेष म्हणजे थरुर यांच्या मागणीनंतर काही तासातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. थरुर यांनी वारणसीतील विदारक परिस्थिती मांडत, मोदी सरकारवर टीका केली. सोचा नही था इतने अच्छे दिन आयेंगे, वाराणसी के लोग भी घास खायेंगे, असे ट्विट थरुर यांनी केले आहे. 

दरम्यान, कोरोनाला केवळ करुणेनेच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. आपण या संकटप्रसंगी गरिबांच्या प्रती करुणा दाखवू शकतो. आता नवरात्र सुरू आहे. या निमित्ताने आपण पुढील 21 दिवस 9 गरीब कुटुंबाचे पालन करण्याची जबाबदारी घेतली, तर नवरात्र यशस्वी होईल, असे मोदींनी वाराणसी येथील नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधताना म्हटले. या शिवाय आपल्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांचीही काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज जनतेला केले. संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसबरोबरच्या लढाल्या सुरुवात केल्यानंतर, त्यांनी बुधवारी वाराणसीतील जनतेशी संवाद साधला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूfoodअन्न