शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

CoronaVirus मोदी सरकारचे मोठे पाऊल; 20 कोटी घरांमध्ये पोहोचणार मोफत डाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 11:42 IST

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशभरातील २० कोटी घरांमध्ये केंद्र सरकारकडून डाळीचे वितरण करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना आणि त्यापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महिना उलटून गेल्याने खिशातील पैसे आणि घरातील अन्नधान्य संपत चालले आहे. यामुळे मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील २० कोटी घरांना याचा लाभ मिळणार आहे. 

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशभरातील २० कोटी घरांमध्ये केंद्र सरकारकडून डाळीचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी ५.८८ लाख टन डाळ तयार करणे आणि त्याची वाहतूक करण्याचे काम जोरात सुरु आहे. पीडीएसशी जोडलेल्या घरांना याचा फायदा मिळणार आहे. काही राज्ये एकाचवेळी तीन महिन्यांची डाळ वाटू शकणार आहेत. 

उर्वरित राज्यांना मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत डाळ देण्यात येणार आहे. महिनाभरापूर्वी निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक वितरण प्रणालीला जोडलेल्या कुटुंबांना १ किलो मोफत डाळ देण्याची घोषणा केली होती. आतापर्यत ३०००० टन डाळीचे वितरण करण्यात आले आहे. 

लॉकडाऊन काळात शेती आणि साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी दिल्याने शेतीची तयारी सुरु झाली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये एमएसपी किंमतीवर धान्य खरेदीही सुरु झाली आहे. या खरेदीवर एकूण ७८५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. देशभरात सव्वा लाख शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल खरेदी करण्यात आला आहे. याची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे. 

आणखी वाचा...

...बस खिडकी थोडीशी उघडी ठेवा; कोरोनाला संपवण्यासाठी सरकारचे आवाहन

किम जोंग उनचा मृत्यू की ब्रेन डेड? उद्या मोठ्या घोषणेची शक्यता

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या